Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चपाती हातात देण्याची चूक तर करत नाही ना? वास्तुनुसार होऊ शकते आर्थिक नुकसान

Updated: गुरूवार, 9 जुलै 2026 (17:24 IST)
 
वास्तुशास्त्रानुसार असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते. 
 
आपल्या हिंदू संस्कृतीत पहिली चपाती गाईला आणि शेवटची चपाती कुत्र्याला देण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. परंतु घरातील सदस्यांना किंवा पाहुण्यांना जेवण वाढताना आपण चपाती थेट त्यांच्या हातात देतो का? जर तुम्ही असे करत असाल, तर वेळीच सावध व्हा. वास्तुशास्त्रानुसार, चपाती नेहमी ताटात ठेवूनच वाढली पाहिजे. जाणून घेऊया यामागचे कारण आणि होणारे नुकसान. हातात चपाती देणे का मानले जाते अशुभ?
 
१. दारिद्र्य आणि गरिबीला आमंत्रण
वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या हातात थेट चपाती देता, तेव्हा घरची बरकत (लक्ष्मी) निघून जाते. असे केल्याने अन्नपूर्णा माता आणि धनलक्ष्मी देवी नाराज होतात, ज्यामुळे घरात पैशांची चणचण भासू लागते आणि गरिबी पाय पसरू लागते.
 
२. पुण्य कर्मांचा नाश होतो
शास्त्रात असे मानले गेले आहे की, हातात ठेवून दिलेली चपाती ही 'भिक्षे'सारखी (भीकेसारखी) मानली जाते. जर तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांना किंवा पाहुण्यांना अशी चपाती दिली, तर त्यांना जेऊ घालण्याचे पुण्य नष्ट होते आणि घरात नकारात्मक ऊर्जा वाढते.
 
३. नात्यांमध्ये दुरावा येतो
हातात चपाती दिल्यामुळे देणाऱ्या आणि घेणाऱ्या व्यक्तीमध्ये वैचारिक मतभेद वाढू लागतात. कुटुंबातील सदस्यांमध्ये विनाकारण भांडणे आणि तणावाचे वातावरण निर्माण होते.
 
जेवण वाढण्याची योग्य पद्धत कोणती?
जर तुम्हाला घरात सुख, समृद्धी आणि शांतता टिकवून ठेवायची असेल, तर जेवण वाढताना खालील गोष्टींची विशेष काळजी घ्या:
ताट किंवा प्लेटचा वापर करा: कोणालाही चपाती द्यायची असेल, तर ती नेहमी प्लेट, ताट किंवा पोळीच्या डब्यात ठेवूनच आदराने वाढावी.
आदराने जेवण वाढा: जेवण नेहमी शांतपणे आणि आदराने वाढले पाहिजे. घाईघाईत किंवा चिडून अन्न वाढल्यास अन्नाचा अपमान होतो.
 
विशेष वास्तु टिप : 
स्वयंपाकघरात जेवताना कधीही एकाच ताटात तीन चपात्या एकत्र वाढू नयेत. तीन ही संख्या अशुभ मानली जाते. जर कोणाला तीन चपात्या द्यायच्याच असतील, तर आधी दोन द्याव्यात आणि नंतर एक वाढावी किंवा चपातीची घडी घालून ती ताटात ठेवावी.

सर्व पहा

आर्थिक चणचण दूर होणार! गुरुवारी करा तुळशीचे ४ सोपे तोडगे

श्री दत्ताची आरती- त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा |

रक्षाबंधन खास प्रसंगी भावासाठी बनवा पारंपरिक आणि पौष्टिक ''मूग डाळ बर्फी''

आज नारळी पौर्णिमा! नारळ समुद्राला अर्पण करण्यामागचं नेमकं कारण काय? जाणून घ्या परंपरा

रक्षाबंधन २०२६: भावाच्या राशीच्या स्वामी ग्रहाला अनुकूल रंगाची राखी बांधा

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

पुढील लेख
Show comments