suvichar

Vastu Tips For Shoes and Slippers चप्पल किंवा शूज पालथे ठेवल्यास काय घडते

Updated: सोमवार, 13 जून 2022 (17:02 IST)
 
ज्योतिषशास्त्रानुसार चप्पल किंवा शूज घराच्या आत किंवा बाहेर उलटे ठेवल्याने अनेक गंभीर आणि नकारात्मक परिणाम होऊ शकतात. लोक श्रद्धेनुसार घरात चप्पल आणि बूट उलथून ठेवल्यास घरात रोगाचा प्रवेश होतो. चप्पल आणि शूज उलटे ठेवण्याची कोणती कारणे आहेत आणि त्याचे काय नकारात्मक परिणाम होतात ते जाणून घेऊया.
 
देवी लक्ष्मी रागावते
असे मानले जाते की घरामध्ये एखादी चप्पल किंवा जोडे उलटे पडले तर देवी लक्ष्मी देखील नाराज होते. त्यामुळेच उलटलेली चप्पल ताबडतोब सरळ करावी असे घरातील मोठे सांगत असतात, त्यामागे कोणतेही शास्त्रीय तथ्य नाही.
 
रोग वाढतो
दुसर्‍या लोकमान्यतेनुसार घरात चप्पल आणि शूज उलटे ठेवल्यास रोग, दुःख वाढतात त्यामुळे चप्पल आणि शूज कधीही उलटे ठेवू नका, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते.
 
घरातील त्रासही संभवतो
घरात शूज किंवा चप्पल उलटे ठेवल्यास घरात नकारात्मक ऊर्जा येते. यामुळे घरातील सदस्यांच्या विचारावरही वाईट परिणाम होतो, घरातील सकारात्मकता संपते आणि घरातील वातावरणात अशांतता निर्माण होते. असे मानले जाते की चप्पल उलटी ठेवल्यास घरात कलह निर्माण होतो आणि मारामारी होते. मात्र त्यामागे कोणतेही वैज्ञानिक तथ्य नाही.
 
मानसिक ताण
घराच्या मुख्य दरवाजावर उलटी चप्पल ठेवल्यास घरातील सदस्यांच्या विचारसरणीवर वाईट परिणाम होतो. वास्तूनुसार शूज आणि चप्पल उलटे ठेवल्याने घरातील सकारात्मकता निघून जाते. यामुळे कुटुंबातील सुख-शांती नष्ट होऊन मानसिक तणाव वाढतो.
 
शनीचा क्रोध
धार्मिक श्रद्धेबरोबरच कोणतीही वस्तू योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने ठेवल्यास त्या चांगल्या दिसतात याचेही एक कारण आहे. घरात चपला आणि शूज उलटे ठेवल्याने शनिदेवाचा प्रकोप राहतो, कारण शनिदेव पायांचे कारक मानले जातात.

सर्व पहा

Ashadhi Ekadashi 2026 Wishes in Marathi आषाढी एकादशी शुभेच्छा संदेश मराठीत

भगवान पांडुरंग विटेवर का उभे आहेत? जाणून घ्या भक्त पुंडलिकाची अद्भुत कथा

शुक्रवार व्रत विधी: घरात सुख-समृद्धी हवी आहे? मग आज वैभव लक्ष्मीची पूजा करताना या '६' चुका टाळा

शुक्रवारी ह्या वस्तू दान केल्याने सर्व समस्या नाहीश्या होतात

देशातील एक असे अद्वितीय शिवमंदिर, जिथे शिवलिंगाला पाणी अर्पण केले जात नाही

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments