Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Corona cases in Mumbai- पुढच्या 2 आठवड्यात या भागात कोरोना आटोक्यात येईल

Updated: सोमवार, 20 जुलै 2020 (20:28 IST)
 
माझे दोन्ही वॉर्ड ऑफिसर किरण दिघावकर आणि शरद उघडे हे 100 दिवस घरी गेले नाहीत. सगळेजण जीव ओतून काम करत आहेत. सगळ्यांची ही एकत्रित मेहनत आहे असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
 
भाजपचे आमदार अमित साटम यांनी लोकायुक्तांकडे एमएमआरडीएतर्फे वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे निविदा न मागवता कोविड सेंटर उभारण्याचं काम दिल्याबद्दल तक्रार केली होती. एमएमआरडीएने कोणतीही निविदा न मागवता बीकेसी 40 कोटींपेक्षा जास्त काम दिलं आहे.
 
त्यात 22 कोटी रुपये खर्च हा केवळ तात्पुरते शेड उभारण्यासाठी करण्यात आला आहे. तसंच हे सेंटर 50 टक्केपेक्षा जास्त रिक्त जागा असून एवढे मोठे सेंटर करण्याच्या निर्णयावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचं देखील आमदार साटम यांनी म्हटलं होतं.
 
राज्यात कोरोनाचा हाहाकार वाढतच चालला आहे. मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असून रुग्णांची संख्या थांबण्याचं काही नाव घेत नाहीये. पण अशात आता मध्य मुंबईनंतर उत्तर मुंबईतदेखील पुढच्या दोन आठवड्यात कोरोना आटोक्यात येईल अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
 
राज्यात आज कोरोना रुग्णांच्या संख्येत उच्चांकी वाढ झालीय. गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 9518 रुग्ण आढळून आले आहेत. तर 258 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 3,10,455 एवढी झालीय. तर मृत्यूचा आकडा 12 हजारांच्या जवळ गेला आहे. आज 3906 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात 1,28,730 Active रुग्ण आहेत. तर राज्यातल्या एकूण मृत्यूची संख्या ही 11 हजार 854 वर गेली आहे.
 
काल मुंबईत 1038 नवे रुग्ण आढळून (corona cases in mumbai) आलेत. त्यामुळे मुंबईतल्याच एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 1 हजार 388 एवढी झाली आहे. काल मुंबईत 64 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतल्या रुग्णांची मृत्यूसंख्या ही 5714 वर गेली आहे.
 
तर देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतांनाच कोरोनावरच्या लशींच्या संशोधनातही प्रगती झाली आहे. जगभर धुमाकूळ घालणाऱ्या COVID-19वर लस शोधण्यासाठी सर्व जग प्रयत्न करत आहे. सर्व देशांमधले तज्ज्ञ डॉक्टर्स, औषध निर्माण क्षेत्रातल्या कंपन्या अहोरात्र प्रयत्न करत आहेत.
 
या प्रयत्नांमध्ये भारतही आघाडीवर असून यात 7 कंपन्यांनी (Indian pharma companies) मोठा पल्ला गाठला आहे. यातल्या बायोटेकच्या लशीची मानवी चाचणीसुद्धा सुरु झाली आहे. तर इतर काही कंपन्याही क्लिनिकल चाचण्यांसाठी तयार आहेत. यात यश मिळालं तर 130 कोटींच्या आपल्या देशाला आणि सर्व जगालाच त्याचा फायदा होणार आहे.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

LIVE: एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या जलद धाडींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा मिळाला

मुंबई : तुकाराम मुंडे यांची कठोर कारवाई, ६ आस्थापनांचे परवाने रद्द

रात्रीचा प्रवास अधिक सुलभ होणार, ५० नवीन वंदे भारत स्लीपर गाड्या सुरू होणार

नितीन गडकरी म्हणतात मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग खड्डेमुक्त, पुण्यात ६०,००० कोटी रुपयांचा प्रकल्प प्रस्तावित

महाराष्ट्रातील १.२५ लाख ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठी शिकली, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण

पुढील लेख
Show comments