Dharma Sangrah

Mumbai Unlock Guidelines मुंबईकरांना दिलासा

सोमवार, 16 ऑगस्ट 2021 (11:31 IST)
मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेने सोमवारपासून मुंबईतील सर्व मैदाने, उद्याने, चौपट्या, समुद्र किनारे खुली केली आहेत. सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत या सर्व गोष्टी खुल्या ठेवण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. 
 
सर्व गोष्टी खुल्या केल्या गेल्या असल्या तरी यासाठी पालिकेतर्फे लागू करण्यात आलेल्या नियम आणि अटींचं बंधन पाळण आवश्यक आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि इतर उपाययोजनांचे नागरिकांना अनिवार्यपणे पालन करावे लागणार आहे. तसंच लसीचे दोन डोस घेतलेल्या सामान्य प्रवाशांनाही रविवार १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. 
 
मुंबईत कोरोना परिस्थिती अटोक्यात आली असून काही दिवसांपासून रुग्णवाढ आणि मृत्युदरात घट झाली आहे. त्यामुळे मुंबईतील करोना निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी यासंबंधी आज आदेश जारी केले आहेत.
 
आजपासून सामान्यांसाठी मुंबई लोकल सुरू करण्यात आली असून करोना लसीच्या दोन डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना लोकल ट्रेनने प्रवास करता येणार आहे. दोन डोस घेतलेल्या आणि १४ दिवस उलटून गेलेल्या सामान्य नागरिकांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. 

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

LIVE: उद्धव ठाकरे यांनी बंडखोर उमेदवार बाळ माने यांना पक्षातून काढून टाकले

मुंबईच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर बेस्ट बसची कारला धडक बसल्याने ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

निसर्गाशी जवळीक: पर्यावरण संवर्धनाचे पहिले पाऊल

कॉक्रोच जनता पार्टीचे जंतरमंतरवर शनिवारी व्यापक आंदोलन

सुर्याभाऊची कॅप्टन्सी जाणार

पुढील लेख
Show comments