तुरूंगाधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तलवार दाम्पत्यांनी रूग्णांची सेवा केल्यामुळे त्यांना मिळणारे मानधन घेण्यास नकार दिला आहे. या दोघांनी ४९,५०० रूपये कमावल्याचे तुरूंग अधीक्षक डी. मौर्य यांनी या सांगितले. या दाम्पत्याने तुरूंगातून सुटल्यानंतरही दर १५ दिवसांनी तुरूंगात येऊन कैद्यांवर उपचार करू, असे आश्वासन या दाम्पत्यांनी दिल्याचे ते म्हणाले.