इंडिया टुडे समूह आणि अॅक्सिस माय इंडियाने २५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान सर्वेक्षण केले होते. यामधील आकडेवारीवरुन भाजपाला ११५ ते १२५ जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काँग्रेसला ५७ ते ६५ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला ११६ आणि काँग्रेसला ६० जागा जिंकण्यात यश आले होते. या सर्वेक्षणात १८,२४३ लोकांची मते विचारात घेण्यात आली असल्याचे इंडिया टुडे समूह आणि अॅक्सिस माय इंडियाने म्हटले आहे.