Marathi Biodata Maker

गुजरात किनाऱ्यावर धडकणार वायू

Updated: गुरूवार, 13 जून 2019 (11:54 IST)
 
गुजरातच्या समुद्रकिनार्‍यावर एनडीआरएफच्या टीम तैनात केल्या असून हाय अलर्ट जारी केले गेले आहेत. याचा प्रभावामुळे दोन दिवस कोकण आणि गोव्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असून लोकांना समुद्री किनार्‍यावर जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे. मच्छिमारांना देखील सतर्कचा इशारा केला गेला आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रातही पाहायला मिळतो आहे. कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, मुंबईतही हाय अलर्ट जारी करण्यात आलं आहे.  
 
 ‘वायू’ वादळ धडकणार असल्याच्या अंदाज असल्याने समुद्र किनार्‍यावरील 3 लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. तसेच सौराष्ट्र आणि कच्छमधील बंदरे व विमानतळ बंद करण्यात आली आहेत. रुग्णालय आणि इमरजेंसी सेवा 24 तासांसाठी सज्ज करण्यात आले आहे. युद्धनौका व नौदलाची विमानेही तयार ठेवली आहेत. 
 
वादळाचा धोका बघत मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्याही धावणार नाहीत. तसेच एकूण 70 ट्रेन निरस्त केल्या गेल्या आहेत.
 
समुद्र किनाऱ्याला उधाण आलं असून परिसरात साधारण ताशी 155 ते 165 किमी वेगानं वारे वाहात आहेत. चक्रीवादळामुळे समुद्राला उधाण आले असून किनारी भागात सोसाट्याचा वारे वाहत आहे.  गुजरातल्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात वादळ आणि पाऊस येणार आहे. 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments