Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘क्यार’ वादळाचा धोका मासेमारी ठप्प तर थंडीत पाऊस

Updated: शनिवार, 26 ऑक्टोबर 2019 (10:22 IST)
 
हवामान खात्याने गुरुवारीच कोकण आणि गोव्याच्या किनारपट्टीवर ‘क्यार’ वादळाचा मोठा फटका बसणार असून, त्याबद्द्द्ल रहा असे सांगितले होते. दोन दिवसात हे वादळ दोन्ही किनारपट्ट्यांवर धडकणार असल्याचा अंदाज वर्तवतानाच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत अतिवृष्टीचा इशाराही हवामान खात्याने वर्तवला होता तसे झाले सुद्धा .  काल अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला पावसाने झोडपले आहे. तर  मध्यरात्रीपासून किनारपट्टीवर जोराचे वारे आणि पाऊस सुरू असून मालवण मधल्या देवबाग भागात समुद्राच्या उधाणाचं पाणी भरलं आहे. त्यामुळे देवबाग येथे अनेक घरात पाणी शिरल्याने येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तर राजकोट आचरा जामडूल भागातल्या वस्तीतही समुद्राच्या उधाणाचं पाणी भरलं आहे. मच्छीमारांच्या होड्यांच नुकसान झाल असून या भागात जोराचे वारे आणि पाउस सुरू आहेत. सिंधुदुर्गात कणकवली, देवगड आणि वैभववाडीत पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

पुढील लेख
Show comments