suvichar

‘क्यार’ वादळाचा धोका मासेमारी ठप्प तर थंडीत पाऊस

शनिवार, 26 ऑक्टोबर 2019 (10:20 IST)
मुंबईसह राज्यभरातील सर्वाना आता थंडीची प्रतीक्षा आहे. ऑक्टोबर महिना संपत आला तरी पाऊस थांबत नाहीये. तर दुसरीकडे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदूर्गात मुसळधार पाऊस सुरु आहे. सिंधुदूर्गातल्या कणकवलीत जोरदार पाऊस सुरू आहे. तर  कणकवलीसह देवगड, वैभववाडीतदेखील मुसळधार पावसाने पावसाने हजेरी लावली आहे. या कमी दाबाच्या पट्यामुळे पुढचे 24 तास कोकणात जबरदस्त पाऊस होणार आहे. सोबतच तसेच पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद आणि बीडमध्ये काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडणार असून राज्यात पुढचे तीन दिवस पावसाचेच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
 
हवामान खात्याने गुरुवारीच कोकण आणि गोव्याच्या किनारपट्टीवर ‘क्यार’ वादळाचा मोठा फटका बसणार असून, त्याबद्द्द्ल रहा असे सांगितले होते. दोन दिवसात हे वादळ दोन्ही किनारपट्ट्यांवर धडकणार असल्याचा अंदाज वर्तवतानाच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत अतिवृष्टीचा इशाराही हवामान खात्याने वर्तवला होता तसे झाले सुद्धा .  काल अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला पावसाने झोडपले आहे. तर  मध्यरात्रीपासून किनारपट्टीवर जोराचे वारे आणि पाऊस सुरू असून मालवण मधल्या देवबाग भागात समुद्राच्या उधाणाचं पाणी भरलं आहे. त्यामुळे देवबाग येथे अनेक घरात पाणी शिरल्याने येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तर राजकोट आचरा जामडूल भागातल्या वस्तीतही समुद्राच्या उधाणाचं पाणी भरलं आहे. मच्छीमारांच्या होड्यांच नुकसान झाल असून या भागात जोराचे वारे आणि पाउस सुरू आहेत. सिंधुदुर्गात कणकवली, देवगड आणि वैभववाडीत पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

पुढील लेख
Show comments