Dharma Sangrah

बुलेट ट्रेन विचार न करता घेतलेला निर्णय : शरद पवार

सोमवार, 25 सप्टेंबर 2017 (08:28 IST)

बुलेट ट्रेन महाराष्ट्राच्या फायद्याची नाही, विचार न करता याबाबत घेतलेला निर्णय दुर्दैवी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी येथे केली. बुलेट ट्रेनचा उपयोग महाराष्ट्राला कमी होणार असतानाही महाराष्ट्र व गुजरातवर समान आर्थिक बोजा टाकण्याचा अन्याय मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला कसा, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. बुलेट ट्रेनपेक्षाही हा मोठा निधी सध्याच्या रेल्वेची गुणवत्ता सुधारण्यासाठी, चंद्रपूर-मुंबई रेल्वेसाठी किंवा पाटबंधाऱ्यांसाठी वापरला असता तर ते अधिक फायद्याचे ठरले असते अशी टिप्पणीही त्यांनी केली.

शरद पवार रविवारी विविध कार्यक्रमांसाठी नगरमध्ये आले होते. बुलेट ट्रेनसाठी १ लाख कोटी रुपये इतका निधी खर्च केला जाणार आहे. सध्या रेल्वेची सुरक्षितता, स्वच्छता, गुणवत्ता, स्थानकांची व्यवस्था व प्रवाशांची सुविधा हे प्रश्न महत्त्वाचे असल्याचे पवार यांनी सांगितले.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

पुढील लेख
Show comments