Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ओडिशा रेल्वे अपघात ज्यामुळे झाला ती इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीम काय आहे?

Updated: सोमवार, 5 जून 2023 (10:14 IST)
 
यामुळे गाड्या एकमेकांवर धडकण्याचं प्रमाण लक्षणीय कमी होतं. तसंच रेल्वे प्रवास सुरक्षित होतो.
 
ही व्यवस्था कशी काम करते?
इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीममुळे इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सिस्टीम आणि कॉम्प्युटरचा समावेश आहे. त्यामुळे गाड्यांच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवलं जातं.
 
एकेकाळी एक कर्मचारी रॉड आणि लेव्हलर घेऊन ट्रेन समोर व्यवस्थित धावते आहे की नाही यावर लक्ष ठेवायचा. एखादी ट्रेन वळवायची असेल तर त्या कर्मचाऱ्याला ते हाताने वळवावं लागायचं.
 
पण आता मात्र सॉफ्टवेअरच्या मदतीनेच हे काम बहुतांश प्रमाणात होतं. त्यात सेन्सर्स आणि फीडबॅक पद्धतही उपलब्ध असते. त्यामुळे एखादी ट्रेन कोणत्या वेळेला कुठे आहे हे व्यवस्थित कळतं.
 
या व्यवस्थेत सिग्नल, ट्रॅक सर्किट आणि इतर ठिकाणाहून सुद्धा माहिती मिळते.
 
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की या इंटरलॉकिंग सिस्टिममुळे अपघात झाला आहे. मात्र नक्की कशात बिघाड झाला हे अद्याप कळलेलं नाही.
 
याशिवाय रेल्वे विभाग accelerometers and automatic block signaling systems चा वापर करतं.
 
Accel Counters (AC) technology काही विशिष्ट इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर काम करते. यामुळे एखाद्या ट्रॅक दुसरी एखादी गाडी तर नाही ना याचा शोध लागतो.
 
Automatic Block Signaling (ABC) मुळे रेल्वे ट्रॅक वेगवेगळ्या ब्लॉकमध्ये विभागला जातो. एका ब्लॉकमध्ये एकच ट्रेन हवी. त्यानुसार योग्य सिग्नल दिले जातात.
 
मानवी चुका कमीत कमी व्हाव्या आणि मनुष्यबळाचा कमीत कमी वापर व्हावा यासाठी हे तंत्रज्ञान वापरलं जातं.
कोरोमंडल एक्स्प्रेस लूप लाईनमध्ये गेल्यामुळेही हा अपघात झाला. त्या लूप लाईनवर एक मालगाडी आधीच उभी होती. त्या गाडीचा तेव्हा वेग 126 किमी प्रती तास इतका होता. या वेगामुळेच कोरोमंडल एक्स्प्रेस रुळावरून घसरली.
 
आता समजून घेऊ या की लूपलाईन हा काय प्रकार आहे? अशा लाईन्स का तयार केल्या जातात हेही समजून घेऊ या.
 
लुपलाईन म्हणजे काय?
मुख्य रेल्वे मार्गाजवळ आणखी रेल्वे लाईन उभारण्यात येतात. त्यामुळे अनेक ट्रेन स्टेशनवर एकाच वेळी थांबू शकतात. तसंच इतर ट्रेन्सला मार्ग देण्यासाठीसुद्धा त्यांचा उपयोग होतो. काही अंतरावर लूप लाईन मुख्य रेल्वे लाईनशी जोडल्या जातात.
 
लूप लाईन साधारणपणे 750 मीटरची असते. या मार्गावर दोन इंजिन घेऊनसुद्धा रेल्वे व्यवस्थित थांबू शकते.
 
आता 1500 मी ची लूप लाईन उभारण्याचा रेल्वेचा मानस आहे. त्यामुळे लूप लाईनची लांबी दुप्पट होईल.
 
कवच तंत्रज्ञान काय आहे?
काही तज्ज्ञांच्या मते कवच तंत्रज्ञान वापरलं असतं तर हा अपघात टळला असता. हे तंत्रज्ञान काय आहे?
 
Train Collision Avoidance System (TCAS) लाच कवच असं म्हणतात. 2011-12 मध्ये हे तंत्रज्ञान आणण्यात आलं होतं.
 
या तंत्रज्ञानाचा भाग म्हणून ट्रेन, सिग्नलिंग सिस्टिम आणि रेल्वे ट्रॅकवर रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन डिव्हाईस लावण्यात येतात.
 
हे एकमेकांश अल्ट्रा हाय रेडिओ फ्रिक्वेन्सीने जोडलेले असतात. ते ट्रेनच्या ब्रेकवर नियंत्रण मिळवतात. तसंच ड्रायव्हरला सुद्धा इशारा देतात.
 
या तंत्रज्ञानात ट्रेनची माहिती सातत्याने रिफ्रेश करण्यात येते. ड्रायव्हरने सिग्नल तोडल्यास ड्रायव्हरला इशारा जातो. सिग्नल तोडल्यानेच अनेकदा रेल्वे अपघात होतात.
 
ही व्यवस्था सध्या हावडा चेन्नई या मार्गावर उपलब्ध नाही. कोकण रेल्वे मार्गावर मात्र तिचा वापर केला जातो.
 
Published By- Priya Dixit 
 
 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments