Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यात 'चिपको आंदोलन' का करण्यात येणार आहे?

Updated: शनिवार, 29 एप्रिल 2023 (19:10 IST)
 
"नदीचं नैसर्गिक काढून आम्हाला कुठलाही विकास नकोय हा मेसेज आम्हाला द्यायचा आहे. याची सुरुवात संभाजी ऊद्यापासून होणार आहे. ते गरवारे पुलाकडे नदीपात्रातील रस्त्यावरुन चालत जाणार. नदीपात्रात तिथल्या झाडांजवळ ट्रॅडीशनल पद्धतीने चिपको आंदोलन केलं जाईलं," असं शैलजा देशपांडे यांनी सांगितलं.
 
पुणे नदीसुधार प्रकल्प
पुण्यातील नद्यांची दयनीय स्थिती सुधारण्यासाठी पुणे पालिकेने नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे.
 
हा प्रकल्प 'मुळा-मुठा रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट' या नावानेही ओळखला जातो. या प्रकल्पाअंतर्गत नद्यांच्या काठी अर्थपूर्ण सार्वजनिक क्षेत्र निर्माण केलं जाईल, असं पुणे महापालिकेचं म्हणणं आहे.
 
संपूर्ण पुणे महानगरपालिका क्षेत्रात मुळा, मुठा आणि मुळा-मुठा रिव्हरफ्रंट विकास प्रकल्प राबवला जाणार आहे.
 
या प्रकल्पाचं काम सुरू झालं आहे. या प्रकल्पाचं काम 11 टप्प्यांत होईल. या प्रकल्पासाठी साधारणपणे साडेपाच हजार कोटी एवढा खर्च अपेक्षित आहे.
 
नदीसुधार प्रकल्पावर कोणते आक्षेप?
या प्रकल्पाची घोषणा झाली तेव्हापासूनच यावर आक्षेप घेण्यात आले आहेत. व्यवसायाने आर्किटेक्ट असलेले पुण्यातले पर्यावरणप्रेमी सारंग यादवडकर यांनी मुळा-मुठा नदीसुधार प्रकल्पाविरोधात भूमिका घेतली आहे.
 
याविरोधात ते कोर्टातही गेले आहेत. या प्रकल्पामुळे नद्यांचं काँक्रीटच्या कालव्यात रुपांतर होईल, असा आरोप सारंग यादवडकर यांनी केला आहे.
 
त्याचसोबत या प्रकल्पामुळे नद्यांची पूर पातळी वाढण्याची शक्यता असल्याचा धोकाही त्यांनी वर्तवला आहे.
“पुणे महापालिकेच्या हायड्रोलिक रिपोर्टमध्ये 100 वर्षांत जर पूर आला तर आत्ताच्या नदीपात्रानुसार पाण्याची किती पातळी असेल आणि हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर पाण्याची काय पातळी राहिल हे सगळे तक्ते दिलेले आहेत.
 
"त्या तक्त्यांनुसारच मुळा नदीची पातळी 5 फुटांनी वाढतेय आणि मुठा नदीची पातळी 6-7 इंचांनी वाढतेय. आपण 5 हजार कोटी खर्च करुन पूर पातळी वाढवणार आहोत का?," असा सवाल पर्यावरण प्रेमी सारंग यादवडकर उपस्थित करतात.
 
पुण्याच्या वरच्या भागात धरणं आहेत. या प्रकल्पाचे नियोजन करताना धरणांचा खालच्या भागात नदीच्या पाणलोट क्षेत्रात होणारा पाऊस आणि त्याने वाढणारी पाण्याची पातळी यामध्ये गृहीत धरली नाहीये, असंही सारंग यादवडकर यांनी सांगतिलं.
 
याशिवाय नदीच्या दोन्ही बाजूंनी भर घालून तिथे भिंती बांधण्याच्या प्रस्तावरही तज्ज्ञांनी आक्षेप घेतला आहे.
 
“या प्रकल्पात दोन्ही बाजूंनी नदीपात्रात आत घुसून भिंती बांधल्या जाणार आहेत. दोन्ही बाजूंना भर घालून रिक्लेम जागा तयार केली जाणार आहे. ही जी भर घातली जाईल ती नदीच्या बाजूच्या जागेत जिथे कमी जास्त प्रमाणात पाणी असतं, जीवसृष्टी असते, झाडं असतात, किटक असतात, स्थलांतर करून पक्षी येतात, तिथे होणार आहे.
 
"त्यामध्ये हे सगळं नष्ट होणार आहे. नदीचं एका काँक्रीटच्या कालव्यामध्ये परिवर्तन या प्रकल्पाने होणार आहे,” असं सारंग यादवडकर यांनी सांगितलं.
 
याचसोबत या प्रकल्पामुळे नद्यांची स्वच्छता होणार नाही. शहरातलं प्रक्रिया न करता नद्यांमध्ये सोडलेल्या सांडपाण्यामुळे नद्यांची स्वच्छता होणार नाही, असंही तज्ज्ञांनी नमूद केलं.
 
पुणे महापालिकेची भूमिका काय?
या सगळ्या आक्षेपांसोबतच आता या प्रकल्पाच्या संदर्भात आणखी एक माहिती पुढे आली आहे. या प्रकल्पाच्या कामात जवळपास 6 हजार झाडं बाधित होणार असल्याचा आरोप होतोय.
 
“आता म्हणत आहेत की पहिल्या दोन टप्प्यांसाठी 5 हजार झाडं तोडायची आहेत. नदीवरील पुलं यामध्ये पाडले जाणार आहेत. हा फक्त क्राँक्रीटायझेशनचा प्रकल्प आहे. यामुळे नदीला काही फायदा होणार नाही.
 
"नैसर्गिक झाडं काढून इथले मुळचे नसलेले झाडे लावणार. पण तेही कुठे लावणार? इतक्या क्राँक्रीटायझेशनमधून जागा कुठे आहे? आणि अशा प्रकारच्या कामांसदर्भात आतापर्यंतचा पालिकेचा परफाॅर्मन्स कसा राहिला आहे? या मुद्द्यांचाही विचार व्हायला पाहीजे,” असं सारंग यादवडकर यांनी सांगितलं.
 
बाधित वृक्षांच्या मुद्द्यावर पुणे पालिकेने एक प्रसिद्धीपत्रक काढून यावर पालिकेची भूमिका स्पष्ट केली आहे.
 
या प्रकल्पामुळे बाधित वृक्षांच्या बदल्यात पुणे महापालिकेकडून तब्बल 65 हजार स्थानिक प्रजातींचे वृक्ष लागवड केली जाईल, असं पालिकेनं सांगितलं आहे.
 
"बाधित वृक्षांच्या बदल्यात महानगरपालिका जी वृक्ष लावणार आहेत, ती वृक्ष नैसर्गिकदृष्ट्या नदीच्या पुनरुज्जीवनासाठी उपयोगी ठरणारी असतील. याद्वारे नदीकाठच्या परिसंस्था सुधारण्यासाठी मदत होणार आहे," असंही महापालिकेनं म्हटलं आहे.
 
नदीसुधार प्रकल्पाअंतर्गत कोणत्या सुधारणा प्रस्तावित आहेत?
या प्रकल्पामध्ये कोणकोणते कामं करण्यात येणार आहे, याची माहिती पुणे पालिकेच्या वेबसाईटवर नमूद करण्यात आली आहे.
 
1. पुरापासून संरक्षण करण्यासाठी तटबंदी बांधणे
 
या प्रकल्पात पुण्यातील नद्यांच्या काठावर वसलेल्या परिसराचे अद्ययावत तटबंदी बांधून पुरापासून संरक्षण करण्याचा प्रस्ताव आहे.
नदीकाठच्या अल्पविकसित, मध्यम विकसित आणि मोठ्या प्रमाणावर विकसित भागांमध्ये तिथल्या परिस्थितीनुरूप तटबंदी उभारली जाईल, असं पालिकेचं म्हणणं आहे.
या भागांमध्ये पुराचे पाणी थोपवण्यासाठी नदीच्या दोन्ही बाजूला तटबंदीची रचना केली जाईल व यामुळे महसूल नकाशांमधील व्याख्यांप्रमाणे लाल आणि निळ्या रेषा नदीच्या पाणलोट क्षेत्रात येतील, असं पालिकेच्या वेबसाईटवर या प्रकल्पाची माहीती देताना म्हटलं आहे.
2. नदीच्या पाण्याच्या प्रवाहातील मानवी अडथळ्यांचा प्रभाव कमी करणे
 
नदीवर अंदाधुंद पद्धतीने बांधण्यात आलेले पूल, कॉजवे, विअर्स, चेक डॅम्स इत्यादी बांधकाम पाडून टाकणे किंवा पुनर्रचना, पुनर्बांधकाम करुन त्यांचा नदी प्रवाहात येणारा अडथळा कमी करणे हा प्रकल्पातला प्रमुख प्रस्ताव आहे, अशी माहिती पालिकेकडून सांगण्यात आलं आहे.
यामुळे पुराची वाढलेली पातळी आटोक्यात येईल, असं पालिकेचं म्हणणं आहे.
3. नदीभोवती सार्वजनिक क्षेत्र तयार करणे
 
तटबंदी बांधकामामुळे पुण्यातील नद्यांच्या दोन्ही काठावर एका दीर्घ सार्वजनिक क्षेत्राची निर्मिती करण्याचा प्रस्ताव आहे.
अशा दीर्घ क्षेत्रामुळे लोकांना नदीच्या बाजूने फिरता येईल अशी कल्पना आहे. नद्यांच्या दोन्ही काठांवर साधारणपणे 44 किलोमीटर अंतरावर सुशोभीकरण करण्यात येईल.
4. ड्रेनेज आणि सांडपाणी प्रक्रिया कामकाजाद्वारे प्रदुषण कमी करणे
 
नदीसुधार प्रकल्पामध्ये पुण्यातील नद्यांमध्ये वाहत जाणारे सांडपाणी ‘इंटरसेप्टर स्युअर’मार्फत प्रस्तावित नदीकाठावरील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाकडे वळविण्याचा प्रस्ताव आहे.
सांडपाणी थेट नदीत मिसळण्यापासून रोखण्यासाठी तटबंदीची रचना करण्याचाही प्रस्ताव आहे.
5. कनेक्टिव्हिटीमध्ये सुधारणा
 
पुणे शहरातील नदीमुळे विभागलेला परिसर मर्यदित मार्गांनी जोडलेला आहे, असं पालिकेचं म्हणणं आहे. सध्या अस्तित्वात असलेले रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत करण्यासोबत नद्यांवरच्या पुलांची निर्मिती करणे हा सुद्धा या प्रकल्पाचा उद्देश आहे.
हा परिसर सायकलिंग आणि पादचारी मार्गांनी जोडण्याचादेखील प्रस्ताव पालिकेकडून मांडण्यात आला आहे.
6. नदीला शहराच्या मुख्य प्रवाहात आणणे
 
या प्रकल्पाचा आणखी एक उद्देश असा आहे की, पर्यावरणाचे रक्षण करणारी उद्याने, मोकळ्या जागा आणि सार्वजनिक क्षेत्रांची निर्मिती करणेही या प्रकल्पाअंतर्गत प्रस्तावित आहे.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

पालघरमधील तारापूर एमआयडीसीमध्ये उत्पादनादरम्यान भीषण स्फोट; अनेक कामगार रुग्णालयात दाखल

मुंबई आयकर कार्यालयाच्या तळघरात भीषण आग लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण

LIVE: गिरीश महाजन यांची नाशिकचे तर भरत गोगावले यांची रायगडचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती

Thorle Bajirao Peshwa पराक्रमी योद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जयंती

चंद्रपूरमध्ये दोन गाड्यांची भीषण धडक होऊन महिला पोलीस कॉन्स्टेबलचा जागीच मृत्यू

पुढील लेख
Show comments