Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाप्रसादातून 2000 जणांना विषबाधा

Updated: गुरूवार, 8 फेब्रुवारी 2024 (12:30 IST)
 
मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी गावात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यात सहभागी दोन हजार भाविक आजारी पडले. त्यांना उलट्या, चक्कर येणे, मळमळ आणि जुलाब होऊ लागले. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात जागेअभावी अनेकांना जमिनीवर पडून उपचार करावे लागले.
 
कोष्टवाडी येथील बाळुमामा मेंढ्या गावात सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास धार्मिक प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमात स्थानिक लोकांसोबतच आजूबाजूच्या सावरगाव, पोस्टवाडी, रिसनगाव, मस्की गावातील लोकही जमले होते आणि सर्वांनी जेवण केले होते.
 
एका अधिकाऱ्याने सांगितले की, महाप्रसाद घेणार्‍या शेकडो लोकांना बुधवारी पहाटे उलट्या आणि जुलाबाच्या तक्रारी येऊ लागल्या. सुरुवातीला नांदेडच्या लोहा उपजिल्हा रुग्णालयात 150 जणांना दाखल करण्यात आले. नंतर इतर लोकांनाही अशाच आरोग्याच्या समस्या येऊ लागल्या, असे अधिकाऱ्याने सांगितले.
 
शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इतर रुग्णालयात 870 रुग्ण दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे. परिस्थिती पाहता नांदेडच्या शासकीय आयुर्वेदिक रुग्णालयात अधिक खाटांची व्यवस्था करण्यात आली होती.
 
अधिकाऱ्याने सांगितले की, रुग्णांचे नमुने अन्नातून विषबाधा तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. बाधित गावांमध्ये सर्वेक्षणासाठी पाच पथके तैनात करण्यात आली आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक पथकही तयार करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना उपचारानंतर घरी पाठवण्यात येत आहे.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्र मंत्रिमंडळाने चार महत्त्वाचे निर्णय घेतले

आदिवासी वसतिगृहाचा मुद्दा तापला, सरकारला १० दिवसांचा अल्टिमेटम दिला

अफगाणिस्तान मालिकेसाठी भारतीय टी२० संघ जाहीर, वैभवला संधी

केएमपी द्रुतगती मार्गावर भरधाव वेगातील पिकअप ट्रकला धडकल्याने सहा भाविकांचा मृत्यू

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर सर्वोच्च न्यायालयाकडून एक मोठी घडामोड

पुढील लेख
Show comments