Marathi Biodata Maker

दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना आधार कार्डची सक्ती

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसेल तर त्यांना परीक्षा देता येणार नाही, असे या निर्णयात म्हटले आहे.
 
या परीक्षांचे ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांना परीक्षा अर्जात आधार क्रमांक भरायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नाही त्यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी आधार कार्ड सादर करायचे आहे. आधार कार्ड नसल्यास या वर्षी विद्यार्थ्यांना निकाल देणार नाही असेही मंडळाने स्पष्ट केले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना  ७ नोव्हेंबरपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज भरता येतील. ७ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे.
 
ज्या विद्यार्थ्यांनी आधार कार्ड अद्याप काढले नाही अशा विद्यार्थ्यांनी येत्या चार महिन्यांत आधार कार्ड तातडीने काढावे अशा सूचना सर्व शाळांना मंडळाकडून देण्यात येणार आहेत. 

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

जालना येथे चॉकलेटचे आमिष दाखवून ३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक

फेसबुक आणि इंस्टाग्राम बंद, वापरकर्त्यांना नवीन पोस्ट करता येत नाहीत

अमरावती जिल्ह्यातील धारणीत एका घरातून ५ किलो गांजा जप्त, आरोपीला अटक

LIVE: धारणी येथील एका घरातून ५ किलो गांजा जप्त

महाराष्ट्र सरकारने ॲप-आधारित टॅक्सी कंपन्यांच्या कामकाजाची चौकशी करण्याचे आदेश दिले

पुढील लेख
Show comments