Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दारू पिता का?’ वरून अजित पवारांनी खडसावले..!

Updated: मंगळवार, 15 नोव्हेंबर 2022 (21:04 IST)
 
विरोधी पक्षनेते पवार म्हणाले,
“मी दिवाळीपूर्वीच फडणवीस आणि शिंदे यांची भेट घेतली होती. सध्या तुमच्या पक्षात वाचाळवीरांचं प्रस्थ वाढलेलं आहे. बाकीच्या प्रवक्त्यांनी काय बोलावं तो पक्षाचा अधिकार आहे. पण ज्या प्रकारे मंत्रिमंडळातील सहकारी बोलत आहेत. त्यातून सरकारची प्रतिमा खराब व्हायला मदत होते.”
 
सत्तारांचा समाचार
पुढे अजित पवार म्हणाले, “लोक ऐकत, पहात असतात. लक्षात ठेवत असतात, असं सांगितलं होत,
मंत्री काहीही वक्तव्य करतात चहा पाहिजे का, पाणी पाहिजे का, दूध पाहिजे का असं सामान्य लोक विचारतात. पण त्यानंतरही दारू पाहिजे का… असं विचारण्यापर्यंत मजल गेली आहे. नंतर मी हे सहज म्हणालो, असंही बोलतात. हे सहज बोलायला तुम्ही समान्य नागरिक नाहीत. मंत्री आहात. जबाबदार आहात,” अशा शब्दात अजित पवार यांनी सत्तार यांची कानउघडणी केली.

सरकारवर टीकास्त्र
“मंत्रि पदावर असताना घटना, नियम यांचा आदर करायचा असतो. अंबरनाथमध्ये दिवसा-ढवळ्या बैलगाडा शर्यतीवरून गोळीबार घडला. सरकार काय करतंय? ठाणे जिल्ह्यात किसन नगरमध्ये दोन गटात राडा झाला, पोलीस यंत्रणा राजकीय वाद सोडवण्यात बिझी झाली तर उर्वरीत कामं कोण करणार,” असा सवाल अजित पवार यांनी केला.

यंत्रणा दबावाखाली
“देशात चांगलं प्रशासन म्हणून ओळख आहे. सरकार आल्यापासून पोलीस विभाग तणावाखाली काम करतोय. काल मी जितेंद्र आव्हाड यांना भेटायला गेलो. शहराध्यक्ष आनंद परांजपेंना भेटलो. अनेकांनी मला सांगितलं, पोलीस ऐकत नाहीत. पोलीस सांगतात, आमच्यावर प्रेशर आहे. हे महाराष्ट्राला भूषणावह नाही,” असे अजित पवार म्हणाले.
 
“मंत्रालयातील सचिव दर्जाचे, इतर कर्मचारी तणावात काम करतात. त्यांना सीएम ऑफिसमधून थेट आदेश येतात. सरकार चालवत असताना आदेश आल्यानंतर बजेट, अर्थसंकल्प, पुरवणी मागण्या अशी प्रक्रिया असते. पण वरिष्ठांनी आदेश केलेलं काम ताबडतोब झाले पाहिजे, अशा सूचना असतात. त्यामुळे प्रशासकीय अधिकारीही तणावाखाली असल्याचा आरोप अजित पवार यांनी केलाय.”

Edited By- Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

पेपरफुटी विरोधी विधेयक मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केले

महाराष्ट्रामध्ये १ सप्टेंबरपर्यंत ओला-उबर-रॅपिडोसाठी नोंदणी करणे अनिवार्य

LIVE: नागपूरमध्ये एका भीषण रेल्वे अपघातात दोन भावांचा मृत्यू

अमरावती, अकोला आणि वर्धा पुढील २४ तासांसाठी सतर्कतेचा इशारा

अमरावतीत अंधश्रद्धेच्या कळस,पोटदुखीवर उपाय म्हणून १५ दिवसांच्या मुलीला गरम विळाने चटके

पुढील लेख
Show comments