suvichar

अशोक चव्हाणांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा : मेटे

मंगळवार, 11 मे 2021 (08:03 IST)
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जाणूनबुजून दुर्लक्ष करणारे आणि सरकारला यामध्ये लक्ष घालून देणाऱ्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली.
 
सोमवारी नाशिकच्या दौऱ्यावर होते.  यावेळी  पत्रकारांशी बोलताना विनायक मेटे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने कोणत्याही स्वरूपाचे प्रयत्न केले नाही. त्यामुळेच मराठा समाज हा आरक्षणापासून वंचित राहिलेला आहे. त्याला सर्वस्वी जबाबदार राज्य सरकार आहे. राज्य सरकारने योग्य ते वकील दिले नाही तसेच राज्य सरकारने योग्य ती कागदपत्रे ही पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे दिली नाही त्यामुळे हि केस कमकुवत झाली असे सांगून मेटे म्हणाले की या प्रकरणामध्ये काही प्रमाणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील जबाबदार असून त्यांनी त्याची जबाबदारी घ्यावी अशी मराठा समाजाची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.
 
या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठा मध्ये मागील तीन न्यायाधीश आणि नवे दोन न्यायाधीश आल्यामुळे पाच न्यायाधीशां मध्येच मतभेद निर्माण झाले. त्यामुळे त्याचा परिणाम म्हणून या निकालावर झाला असे ते म्हणाले. न्यायालयामध्ये देखील निकालावरून मतभिन्नता होती हे स्पष्ट होत आहे न्यायालयाच्या खंडपीठाने जो निकाल दिला आहे त्यामध्ये वेगवेगळे मतप्रवाह असल्याचे देखील सांगून ते म्हणाले की आता केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करावा आणि मराठा समाजाला न्याय द्यावा.

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

राज्यात परवानगीशिवाय वृक्षतोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा वनमंत्री गणेश नाईक यांचा इशारा

LIVE: पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट माथा परिसरासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी

सलग पाच टी-२० सामने गमावणारा पहिला भारतीय कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम

लोणावळ्यातील पर्यटन स्थळांवर बीएनएसएसचे कलम १६३ लागू; पवना धरण आणि टायगर पॉइंट ३१ जुलैपर्यंत बंद

WHO चा धोक्याचा इशारा! जगातील ९२% लोकसंख्येला कर्करोगाचा धोका; पुरुष आणि महिलांमधील 'या' कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक

पुढील लेख
Show comments