Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कुणबी प्रमाणपत्र वादावर चंद्रशेखर बावनकुळेंच मोठे वक्तव्य, सरकारने एकही प्रमाणपत्र रद्द केलेले नाही

Updated: मंगळवार, 11 ऑगस्ट 2026 (09:51 IST)
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे की, सरकार किंवा कोणत्याही मंत्र्याच्या निर्देशानुसार एकही कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेले नाही. जात पडताळणी समित्या स्वतंत्रपणे काम करतात आणि सरकार त्यांच्या कामात हस्तक्षेप करत नाही. अलीकडेच, जरांगे पाटील यांनी आरोप केला होता की, बावनकुळे यांच्या निर्देशानुसार मराठ्यांना दिलेली कुणबी प्रमाणपत्रे रद्द केली जात आहे.

हा वाद कथितरित्या रेखा अंबुरे यांचे कुणबी जात प्रमाणपत्र रद्द करण्याशी संबंधित आहे. बीडच्या निवासी उपजिल्हाधिकारी यांनी प्रसिद्ध केलेल्या एका पत्राद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे की, मनोज जारंगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांमध्ये केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. त्यांनी म्हटले आहे की, महसूल मंत्री बावनकुळे यांनी कोणतेही कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचे निर्देश दिलेले नाहीत.

कुणबी जात प्रमाणपत्रांवरून मराठा समाजात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, १० टक्के मराठा आरक्षणाच्या वैधतेवरील निर्णय पुढे ढकलला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्राच्या एसईबीसी कायदा-२०२४ ला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
ALSO READ: पुण्यात भटक्या कुत्र्यांच्या चिमुकलीवर हल्ला, ८० हून अधिक टाके लागले
कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्याचा आदेश तात्काळ मागे घ्यावा आणि चूक दुरुस्त करावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्र्यांची चूक मान्य करावी, अन्यथा तीव्र आंदोलन सुरू केले जाईल. असा इशारा मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
ALSO READ: पुण्यात शॅम्पू आणि पाम तेलापासून बनवल्या जाणाऱ्या दुधाच्या रॅकेटचा पर्दाफाश; २४ आरोपींना अटक
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

आयआयटी मुंबई शिपाई भरती परीक्षेत कॉपी; पवई पोलिसांनी चार उमेदवारांना अटक केली

१४ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य तिरंगा यात्रा आयोजित केली जाणार, मुख्यमंत्री सहभागी होणार

कुणबी प्रमाणपत्र वादावर चंद्रशेखर बावनकुळेंच मोठे वक्तव्य, सरकारने एकही प्रमाणपत्र रद्द केलेले नाही

पुण्यात भटक्या कुत्र्यांच्या चिमुकलीवर हल्ला, ८० हून अधिक टाके लागले

महाराष्ट्रात भूकंप; पालघरमध्ये एका तासाच्या आत दोन भूकंपाचे धक्के जाणवले

पुढील लेख
Show comments