Dharma Sangrah

भाजप नेत्यांवर टीका केल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरूद्ध पोलिसात तक्रार

बुधवार, 28 ऑक्टोबर 2020 (07:45 IST)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणानंतर राजकारण चांगलच तापलं आहे. भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजपातील अनेक नेत्यांवर सडकून टीका केली होती.
 
त्यानंतर भाजपातील नेत्यांनीही पत्रकार परिषदा घेऊन ठाकरे यांच्यावर टीका केली. मात्र आता उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील वाक्याने भावणा दुखावल्याबद्दल औरंगाबाद येथील अॅड. रत्नाकर भिमराव चौरे यांनी त्यांच्या विरूद्ध बेगमपुरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
 
'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यामध्ये माझ्या भारत देशाची तुलना पाकिस्तान व बांगलादेश या दहशतवादी व मुस्लीम राष्ट्रांशी करून माझ्या भारत देशाचा अपमान केलेला आहे व माझी धार्मीक भावना भडकावली आहे.
 
त्यामुळे भारत देशाचा एकअर्थी अपमान झालेला आहे. उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी लाचार होऊन हिंदुत्वाचा त्याग करून खुर्ची संपादन केलेली आहे. त्या संदर्भात मी या आधी सुद्धा आवाज उठविलेला आहे. तरी मुख्यमंत्र्यांनी भारताचा अपमान करून राष्ट्रीय व धार्मीक भावना दुखावल्या, त्यामुळे त्यांच्याविरूद्ध कायदेशीर कार्यवाही करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा', असे अॅड. चौरे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात खणखणीत भाषण करत भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. यावेळी त्यांनी पाकिस्तान आणि बांग्लादेशचा उल्लेख केला होता. त्यावरून चौरे यांनी तक्रार दाखल करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरूद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

कॉकरोच जनता पार्टी १६ जून रोजी नागपूरच्या संविधान चौकात मोठे आंदोलन करणार

कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांना जयपूरमध्ये एका व्यक्तीने कानशिलात लगावली

मोदी सरकार प्रादेशिक पक्षांना उद्ध्वस्त करत आहे नाना पटोले यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

LIVE: कॉकरोच जनता पार्टी १६ जून रोजी नागपूरच्या संविधान चौकात मोठे आंदोलन करणार

सोन्याच्या दरात मोठी वाढ दर प्रति १० ग्रॅम १.५९ लाख रुपयांवर पोहोचला

पुढील लेख
Show comments