Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

खंडणी खोर पत्रकारांना पोलिसांनी पकडले, महिला सरपंचाला देत होते त्रास

Updated: गुरूवार, 27 सप्टेंबर 2018 (17:40 IST)
 
ताडकळस पासून जवळच असलेल्या माखणी गावात घडला. मंगळवारी दुपारी 12 ते 1 च्या सुमारास एका महागड्या चारचाकी वाहनातून सुटा-बुटातील एक तरुण व सोबत सुशिक्षित असलेली तरुणी व अन्य एक जण गावात आले होते. येथील सरपंच कोण आहेत? असा प्रश्न विचारून मोबाईल नंबर घेतला. लगेच सरपंचाच्या पतीला फोन लावून ‘आम्हाला तुमच्या गावातील विकास कामांची माहिती पाहिजे’ असे सांगितले. गावातील विकास कामांची माहिती एका बंद खोलीत कॅमेऱ्यात कैद करून तुम्ही ग्रामपंचायत कार्यालयाला आलेला अंपगाचा निधी का खर्च केला नाही? तसेच गावच्या सरपंच परभणी येथे जिल्ह्याच्या ठिकाणी का राहतात? असे प्रश्न विचारून ही बातमी चॅनेलवर दाखवण्याची धमकी दिली. तसेच ही बातमी चँनलवर दाखवायची नसेल तर 10 हजार रुपयांचे पॉकेट कारचालकाकडे देऊन टाका असे सांगितले. या बोगस पत्रकारांच्या बोलण्यात एकवाक्यता नव्हती.  महिला सरपंचाचे पती अंकुशराव आवरगंड यांनी पैसे देतो परंतु परभणीला चला, असे त्यांना सांगितले. ताडकळस मार्गे परभणीला यावे लागत असल्याने ताडकळसला येताच अंकुश अवरगंड यांनी या चारही बोगस या चॅनलच्या पत्रकारांना थेट ताडकळस पोलीस ठाण्यात आणून झालेली सर्व माहिती पोलिसांना सांगितली. अखेर रात्री उशिरा अंकुश गणपतराव आवरगंड यांच्या फिर्यादीवरून ताडकळस पोलीस ठाण्यात आरोपी राजेश पुंडलिकराव जोंधळे (मराठवाडा ब्युरो चीफ, जनमत चॅनल), मनिषा बालाजी गंदलवार (रा:पेनुर ता.लोहा .जि. नांदेड,) विक्रम एकनाथराव वाघमारे (रा: बळीरामपुर एम.आय.डि.सी.नांदेड) शिवशंकर रमाकांत हिंगणे (रा. बसवेश्वर नगर सिडको नांदेड) यांच्या विरुद्ध कलम 385,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. बोगस पत्रकार अनेक अश्या लोकांना गाठत त्यांच्या कडून पैसे उकलत असतात अश्या लोकांना बळी न पडता पोलिसांना लगेच सांगितले पाहिजे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

एफडीएची दुधातील भेसळीविरोधात मोठी कारवाई करत महाराष्ट्रात २,३४८ किलो दुग्धजन्य पदार्थ आणि २०२ लिटर दूध जप्त

मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'कॅम्पस कनेक्ट' अभियानाचा शुभारंभ केला

LIVE: मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'कॅम्पस कनेक्ट' अभियानाचा शुभारंभ केला

भुलेश्वरचा राजाच्या मूर्तीच्या आगमन सोहळ्यादरम्यान गणेश मूर्ती कोसळली, २ जणांचा मृत्यू

देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या पुण्यातील 'स्कूल्स इको' कार्यक्रमावर हल्लाबोल केला प्रसिद्धीचा स्टंट असल्याचे म्हटले

पुढील लेख
Show comments