suvichar

Bihar report बिहारचा अहवाल पाहून जातनिहाय सर्व्हेक्षणाबाबत निर्णय

मंगळवार, 3 ऑक्टोबर 2023 (08:42 IST)
Decision regarding caste wise survey : बिहारच्या नितीशकुमार सरकारने जातनिहाय जनगणनेचा अहवाल जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रातही या मागणीने उचल घेतली आहे. विरोधकांबरोबरच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही राज्यातील ओबीसींची जनगणना करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
 
याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, बिहार सरकारने अद्याप संपूर्ण अहवाल जाहीर केलेला नाही. संपूर्ण अहवाल आल्यानंतर त्याची अचूकता पडताळून जातनिहाय सर्व्हेक्षण करण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्य वेळी घेतील, असे सांगितले. ओबीसी सर्व्हेक्षणाबाबत राज्य सरकार सकारात्मकच आहे. त्याबाबत आम्ही कधीच नकारात्मक भूमिका घेतलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
बिहारच्या जातनिहाय जनगणनेबाबत विचारले असता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ओबीसींसंदर्भात बिहार सरकारची काही आकडेवारी बाहेर येत आहे. त्यांनी अद्याप संपूर्ण अहवाल जाहीर केलेला नाही. तो संपूर्ण अहवाल आल्यानंतर आम्ही तो पाहू. त्याची अचूकता किती आहे हे पडताळून पाहू. बिहारने जी पद्धत अवलंबली तीच अवलंबायची की अन्य पद्धतीने सर्व्हेक्षण करायचे याचा निर्णय घ्यावा लागेल. बिहार वगळता अन्य कोणत्याही राज्याने अगदी काँग्रेसप्रणित राज्यातही या संदर्भात अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. ओबीसी सर्व्हेक्षणासंदर्भात राज्य सरकार सकारात्मकच आहे. आम्ही त्या बाबत कधीच विरोधी भूमिका घेतलेली नाही. सर्व्हेक्षणाबाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे योग्य वेळी घेतील, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

LIVE: धर्मांतर आणि महिलांच्या छळाच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी एक विशेष समिती स्थापन होणार

वर्षभर चांगला भाव मिळतो; शिमला मिरची लागवड प्रचंड नफा मिळवून देणारा व्यवसाय

प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्रात अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात कठोर कारवाईची घोषणा केली

महाराष्ट्रात धर्मांतर आणि महिला छळाच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी एक विशेष समिती स्थापन केली जाणार

कॅफेमध्ये कट रचला गेला; सीसीटीव्ही फुटेजमधून खुलासा; केतनची हत्या एखाद्या बॉलिवूड चित्रपटासारखी

पुढील लेख
Show comments