Marathi Biodata Maker

"आत्मपरीक्षण करा, महाराष्ट्र तुम्हाला कधीही माफ करणार नाही", देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधींना सल्ला

Updated: मंगळवार, 4 फेब्रुवारी 2025 (08:58 IST)
मिळालेल्या माहितीनुसार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्राच्या मतदार यादीत हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येइतके सुमारे ७० लाख मतदारांची नावे जोडण्यात आली असल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी केला. तसेच त्यांच्या आरोपाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस म्हणाले, "आत्मनिरीक्षण करण्याऐवजी तुम्ही निंदा करत आहात. महाराष्ट्रातील जनता तुम्हाला यासाठी माफ करणार नाही. तुम्ही कितीही माफी मागितली तरी चालेल!" आत्मपरीक्षण करा असा फडणवीसांचा राहुल गांधींना सल्ला आहे.

फडणवीस पुढे म्हणाले, "महाराष्ट्राचा अपमान करण्याऐवजी तुम्ही आत्मपरीक्षण करावे! तुम्ही महाराष्ट्रातील लोकांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा फुले आणि वीर सावरकरांच्या भूमीचा अपमान केला आहे. तुम्ही महाराष्ट्रातील लोकांचा अपमान केला आहे. तुमचा पक्ष येथे निवडणूक हरला म्हणून तुम्ही तुम्हाला दिलेल्या लोकशाही जनादेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे." राहुल गांधी यांनी निवडणूक व्यवस्थेला एक गंभीर समस्या म्हटले होते.

Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: पश्चिम रेल्वेकडून मोठी कारवाई: चर्चगेट-विरार रेल्वेमार्गालगतची बेकायदेशीर अतिक्रमणे हटवण्याची मोहीम

मी हक्कांविषयी बोलण्यासाठी गेलो होतो; पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर शरद पवारांनी दिल्ली दौऱ्याचे कारण स्पष्ट केले

सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे मुंबईत पूरस्थिती; ४८ तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी

एसी, रेफ्रिजरेटर, की सीलिंग फॅन; वर्षभरात कोणते घरगुती उपकरण सर्वाधिक वीज वापरते?

तुम्ही घरबसल्या रहिवासी प्रमाणपत्र कसे मिळवू शकता? येथे जाणून घ्या....

पुढील लेख
Show comments