Festival Posters

मग हॅकरने केलेले आरोप कसे खरे वाटले : खडसे

सोमवार, 28 जानेवारी 2019 (09:16 IST)
अमेरिकेतील हॅकर सय्यद शुजा याने ईव्हीएम मशीनच्या हॅकिंगबाबत गोपीनाथ मुंडे यांना माहिती असल्यानेच त्यांची हत्या झाल्याचा दावा केला आहे. यामुळे भाजपातील नेते हॅकर खोटारडे असतात, त्यांच्यावर विश्‍वास ठेवू नये, असे म्हणत आहेत. मात्र, माझ्या बाबतीत हॅकर मनीष भंगाळे यांने थेट दाऊदशी संबंध जोडले, त्याच्या बोलण्यावर कसा विश्‍वास ठेवला? असा प्रश्‍न माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे. फैजपूर येथे पत्रकार संघाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या या वक्‍तव्यामुळे भाजपाची चांगलीच अडचण झाली आहे. 
 
आ. खडसे म्हणाले, भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या ईव्हीएम मशीनच्या माहितीमुळे झाली असल्याचा दावा हॅकर सय्यद शुजा याने केला.  त्यानंतर भाजपाने हॅकर हे खोटारडे असल्याने त्यांच्यावर विश्‍वास ठेवू नये, अशी भूमिका मांडली आहे. मात्र, माझ्या बाबतीत हॅकरने केलेले आरोप कसे खरे वाटले. तसेच या प्रकरणी मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासाअंती हा दावा खोटा ठरला. 
 
मुंडे यांच्याबाबत हॅकरला खोटे ठरविणार्‍यांना माझ्याबाबत कसे खरे वाटले? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे. माझ्यावर झालेल्या मीडिया ट्रायलमुळे मला पदाचा राजीनामा द्यावा लागला. अशा मीडिया ट्रायलमुळे एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्‍त केली.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

NEET UG Re-Exam: हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे प्रश्नपत्रिका पोहोचवल्या जातील, जीपीएस मॉनिटरिंग आणि पासवर्डद्वारे होणार सुरक्षा

आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजीच्या दरात ४६% वाढ, उज्ज्वला योजनेअंतर्गत आता ४ अनुदानित सिलिंडर मिळणार

LIVE: रोहित पवार यांनी १२ जूनपासून पंढरपूरमध्ये अनिश्चित काळासाठी उपोषणाची घोषणा केली

मुंबई उच्च न्यायालयाकडून एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाला दिलासा, एक-वेळ स्पेक्ट्रम शुल्क आकारण्याचा सरकारचा निर्णय रद्द

दुबईमध्ये झालेल्या एका गंभीर रस्ते अपघातात अनेक भारतीय कामगारांसह सात जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments