Dharma Sangrah

समाजकंटक शेतकऱ्यांच्या जीवावर दुष्काळात काढलेले सोयाबीन जाळून टाकले

शनिवार, 20 ऑक्टोबर 2018 (08:00 IST)
लातूर जिल्ह्यावर यंदा पावसाने सूड उगवला आहे. सरकारही लक्ष द्यायला तयार नाही. अशा अवस्थेत कसंबसं पीक काढून शेतकर्‍यांनी रचलेली सोयाबीनची गंजच पेटवून देण्याचा प्रताप पानचिंचोली गावात घडला आहे. पानचिंचोलीत ऋषी होळीकर या तरुण शेतकर्‍याने तीन एकरमध्ये सोयाबीनची लागवड केली होती. फलधारणा होऊन पीक परिपक्व होईपर्यंत त्यांनी प्रतिक्षा केली. पण मळणी यंत्र न मिळाल्याने त्यांनी या सोयाबीनची गंज रचून ठेवली होती. मळणी यंत्र दोन दिवसांनी मिळायचे होते. काल दसरा असल्याने सगळेजण गावात होते. ही संधी साधून अज्ञातांनी ही गंज पेटवून दिली. ही गंज तशीच राहिली असती तर किमान ३० क्विंटल सोयाबीन निघाले असते. त्यातून या शेतकर्‍य़ास एक ते दीड लाख रुपये मिळाले असते. एकीकडून आस्मानी संकट मारते, दुसरीकडून सुलतानी संकट हातात तलवार घेऊन तयारच असते, आता गावातलेच शत्रू आपल्या विकृत समाधानासाठी असे प्रयत्न करीत आहेत. 
 
या प्रकरणी तलाठ्याचा पंचनामा झाला असून आता पोलिसात तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.  

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

मध्य रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे गाड्यांच्या वेगावर परिणाम होणार

LIVE: मध्य रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे गाड्यांच्या वेगावर परिणाम होणार

दूषित पाण्यानंतर नवी मुंबईत वीज संकटाचा सामना अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित

नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीषा वाघमारे यांना जामीन मिळणार नाही!

सुप्रिया सुळे यांच्या घोडेबाजाराच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रत्युत्तर

पुढील लेख
Show comments