Festival Posters

कोकणात नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020 (12:53 IST)
राज्यात पावसाने जोर पकडला आहे. मुंबई आणि भोवतील परिसरात पावसामुळे लोक हैराण होत आहे. अशात कोल्हापूर तसेच कोकणातील काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. मुंबई, कोकणात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे असून खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात विविध ठिकाणी एनडीआरएफ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
 
राज्याच्या विविध भागांत नद्यांना पूर आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील कोदवली नदीने धोक्याची पातळी ओलांडली. पावसामुळे निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून ‘एनडीआरएफ’च्या मुंबईत पाच, सातारा, ठाणे, पालघर, नागपूर, रायगड जिल्ह्यात प्रत्येकी एक अशा तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत.
 
मुंबई, कोकण आणि कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. तसेच पावासाने आतापर्यंत दोन लोकांचा बळी घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात दरड कोसळून एकाचा मृत्यू झाला असून मुंबईत मस्जिद बंदर येथे विजेच्या धक्क्याने रेल्वेचा एक कर्मचारी ठार झाला. 
 
अतिवृष्टीत अडचणीत सापडलेल्या लोकांना तातडीने मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनास दिले आहेत.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत ६३ लाख शेतकऱ्यांच्या २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची ऐतिहासिक घोषणा

LIVE: एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, बच्चू कडू यांचा दावा

ट्रम्पचे जवळचे अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांचे अल्पशा आजारानंतर निधन

हीरोने 187 किमी रेंज आणि 90 किमी/तास टॉप स्पीड असलेली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

पुढील लेख
Show comments