suvichar

मुंबई-पुण्यात ऑरेंज अलर्ट तर रायगडमधील शाळांमध्ये सुट्टी जाहीर; आयएमडीने मुसळधार पावसाचा इशारा दिला

Updated: गुरूवार, 19 जून 2025 (19:02 IST)
 
तसेच पालघर व्यतिरिक्त, पुणे आणि नाशिकच्या घाट भागात बुधवारी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेता, शाळांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी १९ जून रोजी शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. 
 
मुंबई-ठाण्यात ऑरेंज अलर्ट
बुधवार सकाळपासून मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने आता ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. 
 
पुण्यातही मुसळधार पाऊस
पुण्यात सकाळपासून सतत पाऊस पडत आहे. तसेच घाट परिसरात आणि पर्यटन स्थळांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पर्यटकांसाठीही निर्बंध लादण्यात आले आहेत.
ALSO READ: मुंबई: कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत विद्यार्थिनीची आत्महत्या
राज्याच्या इतर भागातही सतर्कतेचा इशारा
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याचा अंदाज आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, गोंदिया, लातूर, बीड, नांदेड यासह अनेक जिल्ह्यांमध्ये विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
ALSO READ: सातारा : राज्य परिवहन मंडळाच्या बसला अपघात; अनेक प्रवासी जखमी
हवामान विभाग आणि जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या, डोंगराळ भागात आणि भूस्खलनाच्या प्रवण भागात राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. व  लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.
ALSO READ: पुण्यात महिलेने सहा वर्षाच्या मुलाला सोबत घेऊन इमारतीच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: मुंबईच्या शताब्दी रुग्णालयात सप्टेंबरपासून केमोथेरपी वॉर्ड सुरू होणार

अमरावतीत महाराष्ट्र बंदचा परिणाम, विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ मोर्चा शांततेत निघाला

२०३० पर्यंत महाराष्ट्राला क्रमांक १ बनवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आढावा

महाराष्ट्रातील सर्व शाळांना तातडीने सुरक्षा तपासणी करण्याचे आदेश

सोनम वांगचुक यांनी उपोषण संपवले, सरकारने तीन प्रमुख मागण्या मान्य केल्या

पुढील लेख
Show comments