Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई-पुण्यात ऑरेंज अलर्ट तर रायगडमधील शाळांमध्ये सुट्टी जाहीर; आयएमडीने मुसळधार पावसाचा इशारा दिला

Updated: गुरूवार, 19 जून 2025 (19:02 IST)
 
तसेच पालघर व्यतिरिक्त, पुणे आणि नाशिकच्या घाट भागात बुधवारी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेता, शाळांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी १९ जून रोजी शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. 
 
मुंबई-ठाण्यात ऑरेंज अलर्ट
बुधवार सकाळपासून मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने आता ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. 
 
पुण्यातही मुसळधार पाऊस
पुण्यात सकाळपासून सतत पाऊस पडत आहे. तसेच घाट परिसरात आणि पर्यटन स्थळांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पर्यटकांसाठीही निर्बंध लादण्यात आले आहेत.
ALSO READ: मुंबई: कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत विद्यार्थिनीची आत्महत्या
राज्याच्या इतर भागातही सतर्कतेचा इशारा
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याचा अंदाज आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, गोंदिया, लातूर, बीड, नांदेड यासह अनेक जिल्ह्यांमध्ये विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
ALSO READ: सातारा : राज्य परिवहन मंडळाच्या बसला अपघात; अनेक प्रवासी जखमी
हवामान विभाग आणि जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या, डोंगराळ भागात आणि भूस्खलनाच्या प्रवण भागात राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. व  लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.
ALSO READ: पुण्यात महिलेने सहा वर्षाच्या मुलाला सोबत घेऊन इमारतीच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

LIVE: आयएएस तुकाराम मुंडे यांनी एफडीएच्या २९ कर्मचाऱ्यांना थेट इशारा दिला

नियमांनुसार काम करता येत नसेल तर राजीनामा द्या…तुकाराम मुंडे यांनी एफडीएच्या २९ कर्मचाऱ्यांना थेट इशारा

ट्रेनमध्ये धूम्रपान करणे आता खूप महागात पडणार! रेल्वेने दंड २० पटीने वाढवून ₹१०० वरून ₹२,००० केला

"तुम्हाला काम करायचे नाही, तर पगारही घेऊ नका," मुंबई उच्च न्यायालयाने डॉक्टरांना फटकारले; संप तात्काळ मागे घेण्याचे आदेश

उत्तम पीक येण्यासाठी आणि चांगले उत्पादन मिळवण्यासाठी शेतीची महत्त्वाची कामे

पुढील लेख
Show comments