Festival Posters

मराठवाड्यात शंभर टक्के दुष्काळ, खरीप हंगामात 8 हजारहून अधिक गावांना 50 पैशांपेक्षा कमी आणेवारी

बुधवार, 20 डिसेंबर 2023 (11:44 IST)
यंदा मराठवाड्याला खरीप हंगामात भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत असून कृषी विभागाने जाहीर केलेल्या सुधारित आणेवारीनुसार मराठवाड्यातील 8 हजार 496 गावांमध्ये सरासरी खरीप आणेवारी केवळ 47.42 टक्के इतकी राहिली आहे. 
 
मान्सूनच्या उशिरा आल्याने पेरणी लांबली आणि नंतर अतिवृष्टीमुळे तसेच पावसाच्या लांबलेल्या खंडामुळे पिकांची वाढ खुंटली. यामुळे खरीप ज्वारी, बाजरी, तूर, कापूस, हरभरा या प्रमुख पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी जमिनीचे धूपण झाले तर काही भागात पावसाच्या अनियमिततेमुळे पिके कोमेजली गेली. शेतकर्‍यांच्या हाती कमी पिक लागले. 
 
नांदेड जिल्ह्यातील 1 हजार 653, धाराशिव जिल्ह्यातील 719, परभणी जिल्ह्यातील 832, जालना जिल्ह्यातील 971, लातू जिल्ह्यातील 952 बीड जिल्ह्यातील 1 हजार 397, हिंगोली जिल्ह्यातील 707 आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 1 हजार 356 गावांचा समावेश असलेल्या या दुष्काळग्रस्त विभागात शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. बर्‍याच ठिकाणी तर 40 टक्क्यांपेक्षाही कमी आणेवारी झाली आहे. 
 
दरवर्षीप्रमाणे 31 ऑक्टोबर रोजी खरीप हंगामाच्या पिकांची सुधारीत आणेवारी जाहीर झाल्यानंतर आता 15 डिसेंबर रोजी अंतिम आणेवारी घोषित करण्यात आली आहे.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

LIVE: १ ऑगस्टपासून डिजिटल स्वाक्षरी चा वापर पूर्णपणे अनिवार्य, महाराष्ट्र शासनाचा निर्णय

7100mAh बॅटरी आणि 144Hz डिस्प्ले असलेला मोटोरोला एज 70 मॅक्स 15 जुलै रोजी लॉन्च होणार

१ ऑगस्टपासून ही शासकीय कागदपत्रे डिजिटल स्वाक्षरीशिवाय दिली जाणार नाहीत, महाराष्ट्र शासनाचा निर्णय

7 इलेक्ट्रिक स्कूटर्स, कमी उंचीच्या लोकांनाही ट्रॅफिकमध्ये अडचण येणार नाही, यादी पहा

मुंबईतील बीएमसी रुग्णालयांमध्ये 'एक रुग्ण, एक कुटुंबीय' नियम लागू होणार

पुढील लेख
Show comments