Marathi Biodata Maker

दोघा पवारांमध्ये ट्वीटर वार अजित पवार यांना दिले शरद पवार यांनी हे उत्तर

सोमवार, 25 नोव्हेंबर 2019 (09:46 IST)
काका पुतण्या वाद काही महाराष्ट्रात नवीन नाही. आता तो वाद पवार यांच्या घरात सुरु झाला आहे. यामध्ये अजित पवार यांनी माध्यमातून व्यक्त होणे टाळले मात्र त्यांनी सोशल मिडीयावर आपले मत व्यक्त केले आहे. या उत्तरला शरद पवार यांनी सुद्धा उत्तर दिले आहे. त्यामुळे आता दोघा पवारांमध्ये ट्वीटर वार सुरु झाले आहे.
 
अजित पवार म्हणाले की मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे आणि कायम राष्ट्रवादीमध्येच राहीन. शरद पवार साहेब आमचे नेते आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून लोकांच्या कल्याणासाठी महाराष्ट्रात स्थिर सरकार देतील, असं ट्वीट त्यांनी केले आहे.
 
अजित पवारांच्या या ट्वीटमुळं अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र अजित पवारांच्या  ट्वीटला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी जोरदार सडेतोड  उत्तर दिले  आहे.
 
काय म्हणाले शरद पवार?
"भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रश्नच नाही. शिवसेना, काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसनं एकमतानं घेतला आहे. अजित पवारांचे विधान खोटे, दिशाभूल करणारे आणि खोडसाळ असून समाजात चुकीचा समज पसरविणारे आहे." असं शरद पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
 
अजित पवार परतणार नाहीत 
राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काही शांत असलेल्या अजित पवार यांनी मौन सोडले आहे. अजित पवार हे पहिल्यादांच ट्विटवर सक्रिय दिसून आले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री झाले त्या बद्दल सर्वांचे आभार मानले आहे,  यातून त्यांनी आपण निर्णयावर ठाम असून, त्यावरून माघार घेणार नसल्याचे संकेत अप्रत्यक्षरित्या दिले आहेत.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: दिल्लीतील आंदोलनाची ठिणगी महाराष्ट्रात भडकली, बहुजन वंचित आघाडीकडून २३ जुलै रोजी बंदची हाक

महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट तर पुणे घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी

मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसनिमित्त २२ ते २९ जुलै दरम्यान 'हरित महोत्सव' आयोजित करण्यात येणार

उद्धव ठाकरे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी २२ जुलै रोजी दिल्लीतील जंतर मंतरवर दाखल होणार

दिल्लीतील आंदोलनाची ठिणगी महाराष्ट्रात भडकली, बहुजन वंचित आघाडीने २३ जुलै रोजी बंदची हाक दिली

पुढील लेख
Show comments