Festival Posters

संभाजी भिडेंना अटक कधी होणार? - आ. जितेंद्र आव्हाड

सोमवार, 26 मार्च 2018 (16:23 IST)

मुंबईत आंबेडकरी जनतेचा मोठा ‘एल्गार’मोर्चा धडकला आहे. संभाजी भिडे यांना अटक करण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे. भिमा-कोरेगाव प्रकरणाला अडीच महिने झाले, तरी संभाजी भिडे पोलिसांना सापडत नाहीत. सरकार संभाजी भिडेंना अटक कधी करणार? याचा खुलासा व्हायला हवा, अशी मागणी आ. जितेंद्र आव्हाड  यांनी विधानसभेतील एका चर्चेदरम्यान केली.

 
भिडे स्वत: पत्रकार परिषद घेतात. सरकारला धमकी देतात. असे असूनही सरकार त्यांना अटक का करत नाही? सरकारला नक्की काय हवे आहे?, असा प्रश्न त्यांनी विचारला.
 
एकीकडे सरकार भिडेंना अटक करत नाही, तर दुसरीकडे मोर्चाला परवानगी दिली जात नाही. हे सरकार लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. रत्नागिरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली आहे. असे अनेक प्रकार राज्यात घडत आहेत. सरकारच्या संदिग्ध भूमिकेमुळे या साऱ्याला सरकारचा पाठिंबा आहे का? अशी शंका येते. अध्यक्षांनी सरकारला याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश द्यावेत, अशीही मागणी केली.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

सरकारने ३६,००० कोटी रुपयांचे कर्ज माफ करून आपले वचन पूर्ण केले- चंद्रशेखर बावनकुळे

LIVE: महाराष्ट्र देशातील पहिले रेल्वे गेट-मुक्त राज्य बनेल

18,000 कोटी रुपयांचा बदलापूर मेट्रो-14 प्रकल्प आता दोन टप्प्यांत पूर्ण होणार

ऑनलाइन कोर्स घेताना 90% विद्यार्थी करतात ही चूक; तुम्ही करणे टाळा

महाराष्ट्र देशातील पहिले रेल्वे गेट-मुक्त राज्य बनेल, मुख्यमंत्री फडणवीस यांनी ६५ प्रकल्पांना मंजुरी दिली

पुढील लेख
Show comments