Marathi Biodata Maker

महाराष्ट्रावर महादुष्काळाचे संकट! अनेक शहरांत पाणीकपात

वेबदुनिया न्यूज टीम
मंगळवार, 16 जून 2026 (17:19 IST)
महाराष्ट्रात सध्या पाणीटंचाईचे गंभीर संकट आहे. राज्यातील अनेक भागांत दुष्काळासारखी स्थिती निर्माण झाली आहे आणि प्रमुख शहरांमध्ये पाणीकपात सुरू झाली आहे.
 
तसेच मान्सून लांबणीवर पडल्यामुळे आणि 'एल निनो'च्या वाढत्या प्रभावामुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रावर तीव्र जलसंकटाचे महादुष्काळसदृश परिस्थितीचे सावट निर्माण झाले आहे. राज्यातील धरणांमधील पाणीसाठा कमालीचा खालावला असून, परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून अनेक प्रमुख शहरांमध्ये अधिकृत पाणीकपात लागू करण्यात आली आहे.
 
सध्याची भीषण परिस्थिती आणि शहरांमधील पाणीकपात
धरणांची सद्यस्थिती (पाणीसाठा तळ गाठतोय)
केवळ २४% पाणीसाठा: राज्यातील सर्व लहान-मोठ्या धरणांमध्ये मिळून सध्या सरासरी फक्त २४.४१% ते २४.७४% उपयुक्त जलसाठा शिल्लक आहेगेल्या वर्षी याच काळात तो सुमारे ३१% होता. हा साठा जेमतेम पुढील ८0 ते ८५ दिवस ऑगस्ट अखेरपर्यंत पुरेल इतकाच आहे.
 
पुणे विभाग सर्वाधिक प्रभावित: पुणे विभागातील धरणांमध्ये सर्वात कमी म्हणजेच अवघा १४.५४% पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाडा छत्रपती संभाजीनगर - २६.७२% आणि नाशिक (२५.०७%) विभागांतही चिंताजनक परिस्थिती आहे. अशी माहिती समोर आली आह।  
 
मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील ३,०२८ धरणांमध्ये फक्त २४-२५% साठा शिल्लक आहे. पुणे विभागात सर्वात कमी तर इतर विभागांमध्ये २६-३८% पर्यंत आहे तसेच पुण्यात १५ जूनपासून एक दिवस आड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून खडकवासला धरण समूहात फक्त १४% साठा उपलब्ध आहे अशी माहीत समोर आली आहे. तसेच टँकर फेऱ्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे.  
 
कारणे
मॉन्सूनची कमतरता: जूनच्या पहिल्या पंधरवड्यात ३०% पावसाची कमतरता असून एल-निनो प्रभावामुळे कमकुवत मॉन्सूनचा अंदाज आहे.
 
टँकरची संख्या हजारापार: राज्यातील २० हून अधिक जिल्ह्यांतील तब्बल ३,५०० पेक्षा जास्त गावे आणि वाड्या सध्या पूर्णपणे सरकारी टँकर्सवर अवलंबून आहे. 
ALSO READ: कोकणवासियांसाठी एक आनंदाची बातमी; रत्नागिरी येथून लवकरच प्रवासी विमानसेवा सुरू होणार
प्रशासनाचे आवाहन: पाऊस सक्रिय होईपर्यंत नागरिकांनी पाण्याचा अत्यंत जपून आणि पुनर्वापर करून वापर करावा. टेरेसवरील टाक्या ओव्हरफ्लो होणार नाहीत याची काळजी घ्यावी आणि सोसायट्यांनी गाड्या धुणे किंवा अंगण धुणे टाळावे. पाण्याचा काटकसर वापर करा. गळती दुरुस्त करा, पाणी साठवणूक करा, अनावश्यक वापर टाळा, कार धुणे, बागेला पाणी घालणे इ. तसेच टँकर व्यवस्था, जलसंधारण प्रकल्प, मर्यादित पुरवठा नियोजन सुरू आहे.
ALSO READ: मुंबईकरांची 'लाईफलाईन' अधिक सुकर होणार; 'जोगेश्वरी टर्मिनस' उभारण्याचे काम वेगाने सुरू
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

मोठ्या अनुपस्थितीनंतर भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा दोहा डायमंड लीगमध्ये पुनरागमन करणार

Indian cricket team भारतीय संघ एकाच दिवसात सकाळपासून संध्याकाळपर्यंत तीन सामने खेळणार

ऑपरेशन टायगर'च्या अफवांवर संजय राऊतांचे मोठे वक्तव्य

या राज्याच्या शेतकऱ्यांसाठी मोठी भेट: ७५,००० रुपयांपर्यंतची कर्जमाफी!

मुंबईकरांची 'लाईफलाईन' अधिक सुकर होणार; 'जोगेश्वरी टर्मिनस' उभारण्याचे काम वेगाने सुरू

पुढील लेख
Show comments