Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रावर महादुष्काळाचे संकट! अनेक शहरांत पाणीकपात

Updated: मंगळवार, 16 जून 2026 (17:21 IST)
केवळ २४% पाणीसाठा: राज्यातील सर्व लहान-मोठ्या धरणांमध्ये मिळून सध्या सरासरी फक्त २४.४१% ते २४.७४% उपयुक्त जलसाठा शिल्लक आहेगेल्या वर्षी याच काळात तो सुमारे ३१% होता. हा साठा जेमतेम पुढील ८0 ते ८५ दिवस ऑगस्ट अखेरपर्यंत पुरेल इतकाच आहे.
 
पुणे विभाग सर्वाधिक प्रभावित: पुणे विभागातील धरणांमध्ये सर्वात कमी म्हणजेच अवघा १४.५४% पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाडा छत्रपती संभाजीनगर - २६.७२% आणि नाशिक (२५.०७%) विभागांतही चिंताजनक परिस्थिती आहे. अशी माहिती समोर आली आह।  
 
मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील ३,०२८ धरणांमध्ये फक्त २४-२५% साठा शिल्लक आहे. पुणे विभागात सर्वात कमी तर इतर विभागांमध्ये २६-३८% पर्यंत आहे तसेच पुण्यात १५ जूनपासून एक दिवस आड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून खडकवासला धरण समूहात फक्त १४% साठा उपलब्ध आहे अशी माहीत समोर आली आहे. तसेच टँकर फेऱ्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे.  
 
कारणे
मॉन्सूनची कमतरता: जूनच्या पहिल्या पंधरवड्यात ३०% पावसाची कमतरता असून एल-निनो प्रभावामुळे कमकुवत मॉन्सूनचा अंदाज आहे.
 
टँकरची संख्या हजारापार: राज्यातील २० हून अधिक जिल्ह्यांतील तब्बल ३,५०० पेक्षा जास्त गावे आणि वाड्या सध्या पूर्णपणे सरकारी टँकर्सवर अवलंबून आहे. 
ALSO READ: कोकणवासियांसाठी एक आनंदाची बातमी; रत्नागिरी येथून लवकरच प्रवासी विमानसेवा सुरू होणार
प्रशासनाचे आवाहन: पाऊस सक्रिय होईपर्यंत नागरिकांनी पाण्याचा अत्यंत जपून आणि पुनर्वापर करून वापर करावा. टेरेसवरील टाक्या ओव्हरफ्लो होणार नाहीत याची काळजी घ्यावी आणि सोसायट्यांनी गाड्या धुणे किंवा अंगण धुणे टाळावे. पाण्याचा काटकसर वापर करा. गळती दुरुस्त करा, पाणी साठवणूक करा, अनावश्यक वापर टाळा, कार धुणे, बागेला पाणी घालणे इ. तसेच टँकर व्यवस्था, जलसंधारण प्रकल्प, मर्यादित पुरवठा नियोजन सुरू आहे.
ALSO READ: मुंबईकरांची 'लाईफलाईन' अधिक सुकर होणार; 'जोगेश्वरी टर्मिनस' उभारण्याचे काम वेगाने सुरू
Edited By- Dhanashri Naik
About Author
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

मोबाईल नंबर आधारशी जोडलेला नसल्यास कोणत्या सुविधा प्रभावित होऊ शकतात? वाचा

काय आहे 'मुंडे इफेक्ट'? IAS तुकाराम मुंडेंचा दणका; Blinkit, Starbucks अन् KFC लाही ठोकली नोटीस!

LIVE: हिंगणघाटमध्ये प्रवासी बसच्या धडकेत ३ विद्यार्थिनींचा मृत्यू

वर्धा जिल्ह्यात हिंगणघाटमध्ये भीषण अपघात, प्रवासी बसच्या धडकेत ३ विद्यार्थिनींचा मृत्यू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली

पुढील लेख
Show comments