Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यातील या जिल्ह्यांमध्ये आज पाऊस आणि गारपिटीची शक्यता

Updated: गुरूवार, 27 एप्रिल 2023 (11:06 IST)
 
हवामान खात्याने नाशिक, अहमदनगर, पुणे येथे पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जारी केले आहे. यासोबतच पुढील 4 दिवस राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात कमी दाबामुळे ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. यासोबतच विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 72 तासांत विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार वारे वाहतील आणि पुणे हवामान खात्याने काही जिल्ह्यांमध्ये गडगडाट आणि गारपीट होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
 
राज्यात आज नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याने येथे ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दुसरीकडे विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्यातही काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
 
तर पुणे आणि परिसरात पुढील पाच दिवस ढगाळ आकाश आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. पुढील ७२ तासांत जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

काँग्रेसकडून स्वबळावर निवडणूक लढवण्याचे संकेत! शरद पवार गटासोबतची युती तोडण्याची मागणी

सरकारची नशामुक्त महाराष्ट्रासाठी मोठी योजना, फडणवीस म्हणाले-प्रत्येक सरकारी रुग्णालयात व्यसनमुक्ती केंद्रे उघडली जाणार

केनियामध्ये हेलिकॉप्टर कोसळले, ५ अमेरिकन नागरिकांसह ७ जणांचा मृत्यू

९३ वर्षांपूर्वीच्या विक्रमाची बरोबरी झाली, मानव सुथारने इतिहास रचला; एका विशेष क्लबमध्ये स्थान मिळवले

बीसीसीआयने दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्याचे ठिकाण बदलले, विजेतेपदाचा सामना बंगळूरुऐवजी चेन्नईत होणार

पुढील लेख
Show comments