Dharma Sangrah

मुंबईची तुंबई होते, मुंबई महानगरपालिकेचे काम आहे तरी कुठे ?

मंगळवार, 26 जून 2018 (17:20 IST)
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांचा सवाल
 
मुंबईत कालपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईत आज सकाळी अनेक भागात पाणी साचले होते. परिणामी मुंबईकरांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. पावसामुळे मुंबईची तुंबई होत असेल तर मान्सूनसाठी सज्ज असण्याचा दावा करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचे काम आहे तरी कुठे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी उपस्थित केला आहे.
 
पुढे बोलताना राखी जाधव म्हणाल्या की मुंबई महानगरपालिकेचे अनेक प्रकल्प अपूर्ण अवस्थेत आहेत. रेल्वेरुळालगतचा कचरा साफ करण्याची जबाबदारी ही प्रशासनाची आहे, मात्र रेल्वे प्रशासान आणि पालिका प्रशासन ही जबाबदारी एकमेकांवर ढकलत आहे. अशामध्ये मुंबईत पाणी तुंबण्याला जबाबदार कोण आहे असा सवालही जाधव यांनी उपस्थित केला.
 
मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुंबईत कुठेच पाणी साचले नसल्याचा अजब दावा केला आहे त्याला उत्तर देताना राखी जाधव म्हणाल्या की मुंबई पाणी साचले की नाही याचे उत्तर जनताच सत्ताधाऱ्यांना देईल.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

सरकारने ३६,००० कोटी रुपयांचे कर्ज माफ करून आपले वचन पूर्ण केले- चंद्रशेखर बावनकुळे

LIVE: महाराष्ट्र देशातील पहिले रेल्वे गेट-मुक्त राज्य बनेल

18,000 कोटी रुपयांचा बदलापूर मेट्रो-14 प्रकल्प आता दोन टप्प्यांत पूर्ण होणार

ऑनलाइन कोर्स घेताना 90% विद्यार्थी करतात ही चूक; तुम्ही करणे टाळा

महाराष्ट्र देशातील पहिले रेल्वे गेट-मुक्त राज्य बनेल, मुख्यमंत्री फडणवीस यांनी ६५ प्रकल्पांना मंजुरी दिली

पुढील लेख
Show comments