suvichar

नागपुरातील 50 तरुण इंग्लंडधून बेपत्ता

Updated: सोमवार, 22 जानेवारी 2018 (14:56 IST)
 
गेल्या दोन ते तीन वर्षांत व्यवसाय व उद्योग करण्याच्या निमित्ताने नागपूरहून अनेक तरुण इंग्लंडमध्ये गेले. मात्र तेथून ते परतले नाहीत. त्यांच्या व्हिसाची मुदत संपल्यानंतर ब्रिटिश सरकारने त्यांचा शोध घेतला असता ते तेथे सापडले नाहीत. त्या सर्व मुलांचे पासपोर्ट नागपुरातील पारपत्र कार्यालयातून तयार करण्यात आले होते. त्यामुळे सप्टेंबर 2017 मध्ये मुंबईतील ब्रिटिश उपउच्चायुक्त कार्यालयाने नागपूर पोलीस आयु्रतांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करा, अशी विनंती केली. त्यानुसार पोलीस आयु्क्तांनी प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयु्क्त सोनाथ वाघचौरे यांच्याकडे सोपवला. त्यांनी आयु्क्तांना अहवाल सादर केला आहे.
 
आठ दाम्पत्यांचा उद्योग
 
या शहरातील आठ दाम्पत्यांनी त्यांचीच मुले असल्याचे भासवून व बनावट दस्तऐवज तयार करून काही तरुणांचे बनावट पासपोर्ट व व्हिसा तयार केले. त्यानंतर या तरुणांना इंग्लंडला पाठवण्यात आले. पण ते भारतात परतलेच नाहीत. या तरुणांच्या जन्मतारखांची तपासणी केली असता त्यांना इंग्लंडध्ये पाठवणार्‍या दाम्पत्यांना केवळ तीन महिन्यांच्या अंतराने मुले झाल्याचे दिसून आले आहे. शिवाय काही दाम्पत्यांना प्रत्यक्षात एक किंवा दोन मुले असताना त्यांनी 19 तरुण त्यांची मुले असल्याचे दाखवले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करून संबंधित दाम्पत्यांची कसून चौकशी केल्यास सर्व प्रकार उघड होईल, अशी शिफारस वाघचौरे यांनी त्यांच्या तपास अहवालात केली आहे. व्हिसाची मुदत संपल्यानंतरही हे तरुण नमके कुठे गेले, याचा ठावठिकाणा इंग्लंड प्रशासनाला अजूनही कळला नाही. त्यामुळे या प्रकरणातील गूढ वाढले आहे.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: देवेंद्र फडणवीस केंद्रीय शिक्षणमंत्री होणार, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर संजय राऊतांचा दावा

प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार, राष्ट्रपतींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारला

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली; म्हणाले-सरकारने तरुणांच्या शक्तीपुढे मान झुकवली

बारामतीमध्ये अजित पवार यांच्या आईची भेट घेतल्यानंतर मंत्री अदिती तटकरे भावुक

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अभिजीत दीपके यांच्या आईची मुलाच्या विजयावर भावनिक प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments