Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात पुन्हा लागणार संचारबंदी, काळजीची गरज

Updated: रविवार, 29 ऑगस्ट 2021 (22:07 IST)
 
केरळमधील ओनम सणाच्या काळात झालेल्या कोरोना प्रादुर्भाव पाहता केंद्राच्या सुचनेची अंमलबाजावणी होईल, मात्र, याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. 
 
केरळमध्ये ओनम सणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. केरळात रुग्णसंख्येत विस्फोटक वाढ झाली असून, केंद्र सरकारने आगामी दहीहंडी व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. केंद्राकडून काही उपाययोजनाही सूचवण्यात आलेल्या आहेत. राजेश टोपे म्हणाले, आगामी काळात राज्यातील सणवार पाहता या बाबत आपल्याला काळजी घेण्याची गरज असून केंद्राच्या सूचनेची अंमलबजावणी ही नक्की होईल. मात्र याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतील. 
 
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी टोपे यांनी रात्रीच्या संचारबंदीचे संकेत दिले. ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्ण अजिबातच नाहीत तिथे शाळा सुरू होऊ शकतात का याची चाचपणी आम्ही करतोय. 5 तारखेपर्यंत राज्यातील सर्व शिक्षक आणि सबंधित कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी स्पेशल मोहीम हाती घेण्यात येणार आहे, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: नागपूरमध्ये एका भीषण रेल्वे अपघातात दोन भावांचा मृत्यू

शेतकऱ्यांना मोठा दिलासा, अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेसाठी ७ हजार कोटी रुपयांना मंजुरी

CWG 2026 : आठव्या दिवशी भारताने दोन पदके जिंकली,लवप्रीतने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकले

Bank Holidays : ऑगस्ट महिन्यात बँका १४ दिवस बंद राहतील, सुट्ट्यांची यादी पहा

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी पक्षाचा राजीनामा दिला

पुढील लेख
Show comments