Festival Posters

पालघर जिल्ह्यात पाणीबाणी, पिपांना कुलूप तर, पाणी माफियांचे वर्चस्व

बुधवार, 24 ऑक्टोबर 2018 (17:32 IST)
आपल्या राज्यात सरकारने अखेर 180 तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करत मदत सुरु केली, मात्र संपूर्ण महाराष्ट्रालाच तीव्रपाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे असे भयानक चित्र आहे. पालघर जिल्ह्यात तर अक्षरशः पाणीबाणी निर्माण झाली असून, सरकारी टँकरने मिळणाऱ्या पाण्यावर उड्या टाकणाऱ्या नायगावातील चाळकऱ्यांनी चक्क पाणी भरून पिंपांना कुलूप ठोकले आहे. रहिवाशांच्या या अफलातून आयडियामुळे चाळीचाळींमध्ये पाणी ‘तिजोरी बंद’ झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे पाणी प्रश्न किती भयानक आणि तीव्र आहे हे समोर येतंय. जून व जुलै महिना वगळल्यास पावसाने दडी मारली. केवळ 77 टक्के पाऊस झाला आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. याचा फटका अनेक शहरांनाही बसू लागला आहे. ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातीलही अनेक तालुक्यांमध्ये ठणठणाट आहे. त्यातच वसई-विरार पालिकेने अनेक चाळकऱ्याना अद्यापपर्यंत पाइपलाइनने पाणीपुरवठा केलेला नाही. त्यामुळे टँकरमाफियांचे चांगले दिवस आले असून पाण्यासाठी दर महिन्याला हजार ते दीड हजार रुपये खर्च करावे लागत आहे. 

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

"त्यांनी माझा बाप काढला, आता निवडणूक लढवणारच!" – बंडखोर गोकुळ गीते यांचा महायुतीला थेट इशारा

IND vs AFG: भारत विरुद्ध अफगाणिस्तान कसोटी सामना ६ जून रोजी सुरू होणार

LIVE: २७ जिल्ह्यांवर मुसळधार पावसाचे सावट; विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला

छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये धुमाकूळ घातल्यानंतर जंगली हत्तींचा कळप ताडोबा व्याघ्र प्रकल्पाकडे सरकला; वन विभागाने अलर्ट जारी केला

पुण्यातील सॉफ्टवेअर इंजिनिअर्सची फसवणूक; ७०० नोकऱ्या गेल्या, रातोरात कंपनी बंद झाली

पुढील लेख
Show comments