गेल्या काही दिवसांत मुंबईत सातत्याने आगीच्या घटना घडत आहे. त्यामुळे मंत्रालयातील फायर अलार्मने देखील पोलिस आणि अग्निशमन दलाचे लक्ष वेधून घेतली. जून २०१२ मध्ये मंत्रालयाच्या सहाव्या मजल्याला आग लागली होती. यात तात्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कार्यालये जळून खाक झाली होती. तसेच तीन जनसंपर्क अधिकाऱ्यांसह १४ जण गंभीर जखमी झाले होते.