Dharma Sangrah

Pahalgam terror attack आमदारांच्या कठोर शब्दांनी काँग्रेसला घेरले, भाजप म्हणाले नाव बदलून पाकिस्तानी पक्ष करा

Updated: सोमवार, 28 एप्रिल 2025 (14:49 IST)
ALSO READ: 'परीक्षेत जानवे, मंगळसूत्रावर बंदी घालण्याचा आदेश चुकीचा', उपमुख्यमंत्री म्हणाले- यामुळे लोकांमध्ये संताप निर्माण होतो
मिळालेल्या माहितीनुसार पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून राजकारण सुरू झाले आहे. पर्यटकांचा धर्म विचारल्यानंतर त्यांच्यावर गोळीबार करण्याबाबत आमदारांनी प्रश्न उपस्थित केल्याने काँग्रेस अडचणीत आली आहे. महाराष्ट्र काँग्रेस नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी धर्म विचारून हत्येच्या मुद्द्यावर वादग्रस्त विधान केले आहे. यावर भाजपने एक उपहासात्मक टिप्पणी केली आहे. भाजपचे म्हणणे आहे की काँग्रेसने त्यांच्या पक्षाचे नाव बदलून पाकिस्तानी पक्ष करावे. वडेट्टीवार यांच्या विधानाचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दिल्लीचे मंत्री आणि भाजप नेते परवेश वर्मा यांनीही निषेध केला आहे. तर भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांनीही काँग्रेसवर हल्लाबोल केला.
ALSO READ: पहलगाम हल्ल्याबाबत बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत शरद पवारांनी अमित शहा आणि राजनाथ सिंह यांच्या भूमिकेचे केले कौतुक
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, काँग्रेसचे नाव बदलून पाकिस्तानस्थित पक्ष केले पाहिजे. एकीकडे, राहुल गांधी सर्वपक्षीय बैठकीत येऊन दहशतवादाविरुद्ध कारवाई करण्याबद्दल बोलतात आणि दुसरीकडे, त्यांच्या पक्षाचे नेते हिंदू पीडितांची खिल्ली उडवतात.  
 
तसेच ते म्हणाले की, आता विजय वडेट्टीवार म्हणत आहे की सरकार जबाबदार आहे, पाकिस्तान जबाबदार नाही आणि दहशतवाद्यांनी धर्माच्या आधारे लोकांना मारल्याचा काही पुरावा आहे का? हे पहिल्यांदाच सांगितले जात नाहीये, राष्ट्रवादी-शरद पवार गटातील अनिल देशमुख यांनीही हेच म्हटले आहे.  
 
मिळालेल्या माहितनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वडेट्टीवार यांचे विधान अत्यंत असंवेदनशील आणि मूर्खपणाचे आहे. असे विधान करणे म्हणजे आपल्या शत्रूंना प्रोत्साहन देण्यासारखे आहे.  
 
काय म्हणाले होते वडेट्टीवार 
पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी सरकारने घ्यावी, असे काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी म्हटले होते.वडेट्टीवार म्हणाले की दहशतवाद्यांनी लोकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारल्यानंतर मारले. हे सर्व करण्यासाठी दहशतवाद्यांना वेळ आहे का? काही लोक म्हणतात की हे घडलेच नाही.  
 
Edited By- Dhanashri Naik 
ALSO READ: पाकिस्तानकडून कुपवाडा आणि पूंछमध्ये पुन्हा गोळीबार,भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

विमानाच्या शौचालयात कोट्यवधी रुपयांचे सोने सापडले, मुंबई विमानतळावरील स्वच्छता कर्मचाऱ्यांसह ५ जणांना अटक

Ration Card Rules कुटुंबातील सदस्य स्वतंत्र शिधापत्रिका कधी मिळवू शकतात? अर्ज करण्यापूर्वी नियम जाणून घ्या..

नाशिकमध्ये एफडीएची मोठी कारवाई लाखमोलाचे संशयास्पद तेल जप्त

LIVE: मुंबईच्या शताब्दी रुग्णालयात सप्टेंबरपासून केमोथेरपी वॉर्ड सुरू होणार

अमरावतीत महाराष्ट्र बंदचा परिणाम, विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ मोर्चा शांततेत निघाला

पुढील लेख
Show comments