Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईला पावसाने जोरदार झोडपले, अनेक ठिकाणी पाणी साचले, वाहतुकीवर मोठा परिणाम

Updated: बुधवार, 24 जुलै 2019 (16:42 IST)
 
अंधेरी, वांद्रे, दादरमध्येही पावसाचा जोर
 
अंधेरी, वांद्रे, दादर या ठिकाणी जोरदार पावसामुले  अनेक ठिकाणी गुडघ्यापर्यंत पाणी  साचले होते. त्यामुळे  पायी जाणाऱ्यांसह,  दुचाकी,  चारचाकी वाहनाने प्रवास करणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल होत होते. तर  सायन ते सीएसएमटी दरम्यान ठिकठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल  त्यामुळे काही प्रमाणात रेल्वे वाहतुकीवरही याचा परिणाम  झाला आणि नेहमी प्झारमाणे मध्य रेल्वेवर लोकल उशिराने धावल्या आहेत. 
 
वसई-विरार-नालासोपाऱ्यात पाणीच पाणी 
 
वसई-विरार-नालासोपारा परिसरातही पाऊस सुरु असू,  मंगळवारी सायंकाळी  पावसाने जोरदार आगमन केलं. रात्रभर पावसाने वसई-विरारला झोडपलं. वसई-विरार-नालासोपाऱ्यात अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. काही ठिकाणी गुडघाभर पाणी साचले आहे. कल्याण-डोंबिवलीमध्येही मंगळवारी मध्यरात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. तर बुधवारी पुन्हा  सकाळी पावसाने पुन्हा जोर धरला. संततधार पावसामुळे कल्याणमधील सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. कल्याणच्या अहिल्याबाई चौक, मोहम्मद अली चौक, शिवाजी चौक, कल्याण पूर्वेतील राजाराम पाटील नगर अशा अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. ठाण्यात जोरदार पावसामुळे  जागोजागी पाणी साचले असून,  रेल्वे सेवेवरही या मुसळधार पावसाचा परिणाम झाल आहे.  मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिराने होत आहे.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: सातारा आणि पंढरपूरमध्ये माजी सैनिकांसाठी अत्याधुनिक सुविधा संकुले उभारली जाणार

अत्यंत पौष्टिक आणि जमिनीचा सुपीकपणा वाढवणारे पीक; वाल लागवड

माजी सैनिकांसाठी सातारा आणि पंढरपूरमध्ये अत्याधुनिक सुविधा उभारल्या जातील-शंभूराज देसाई

विद्यार्थ्यांवर गोळीबार झाला, सरकारने गृहमंत्री हटवावेत, राहुल गांधी पत्रकार परिषदेत गरजले

तुकाराम मुंढे यांचा ऐतिहासिक निर्णय; शाळांच्या ५० मीटर परिसरात आता शीतपेये, वडा पाव, बर्गर आणि आईस्क्रीमवर बंदी!

पुढील लेख
Show comments