Marathi Biodata Maker

पुढील तीन दिवस पावसाचे, ‘या’ जिल्ह्यांना दिला अलर्ट

गुरूवार, 21 एप्रिल 2022 (15:05 IST)
सध्या दिवसभर कडाका वाढला असून सायंकाळी गार हवा जाणवते आहे. अशातच आता २१ ते २३ एप्रिलपर्यंत जवळपास अर्ध्या महाराष्ट्रात (Maharashtra Rain) जोरदार वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 
पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर (K S Hosalikar) यांनी ट्वीट करत ही माहिती दिली. यातील 21 आणि २२ एप्रिल रोजी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे सुटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 
होसाळीकर यांनी केलेल्या ट्विटनुसार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर (Kolhapur), पुणे, सोलापूर, उस्मानाबाद (Osmanabad), लातूर (Latur), नांदेड (nanded) या जिल्ह्यांमध्ये २१ आणि २२ तारखेला विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. याशिवाय बुलडाणा (Buldhana), वाशिम, अकोला (Akola), अमरावती, यवतमाळ (Yavatmal), वर्धा, चंद्रपूर, नागपूर (Nagpur), भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता (Heavy Rain) आहे. २३ तारखेलाही यापैकी काही जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
 
दरम्यान, २० आणि २१ एप्रिल रोजी राजस्थान (Rajsthan) आणि पश्चिम उत्तर प्रदेशात वेगळ्या ठिकाणी धुळीचे वादळ येण्याची शक्यता आहे. २१ आणि २२ रोजी पूर्व उत्तर प्रदेशात आणि आज १९ एप्रिल रोजी राजस्थानच्या वेगवेगळ्या ठिकाणी जोरदार धूळ वाढवणारे वारे ताशी २५-३५ किमी वेगाने वाहण्याची शक्यता असल्याची माहिती होसाळीकर यांनी दिली आहे.

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

LIVE: प्रशासनाने आषाढी वारी २०२६ च्या तयारीला वेग दिला

१८२ देशांमध्ये शांततेचा संदेश दिल्याबद्दल गुरुदेव श्री श्री रविशंकर यांना लक्ज़मबर्ग शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला

छत्रपती संभाजीनगर गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे तीन मजली घराला आग; महिलेचा दुर्दैवी मृत्यू तर नऊ जणांना वाचवण्यात यश

महाराष्ट्रात महिला उद्योजकांसाठी विशेष 'स्टार्टअप हब' सुरू झाले; सरकारने महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठे पाऊल उचलले

परभणी येथील हनुमान मंदिरात मंडपाचे छत कोसळल्याने 5 जणांचा मृत्यू, अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

पुढील लेख
Show comments