suvichar

राज ठाकरे यांनी अयोध्येत गेलं पाहिजे : संजय राऊत

शनिवार, 20 फेब्रुवारी 2021 (16:30 IST)
“महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्येत गेलं पाहिजे. त्यासाठी आम्ही त्यांचं स्वागत करतो. राज ठाकरे अयोध्येत गेल्यानंतर, त्यांना तिथे शिवसेनेने केलेलं कार्य दिसेल” असे संजय राऊत म्हणाले. पुण्यात पत्रकारांनी त्यांना राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबद्दल प्रश्न विचारला, त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं.
 
“अयोध्येत आपलं दैवत, अस्मिता आहे. देशातल्या प्रत्येक राजकीय नेत्याने, कार्यकर्त्यांने अयोध्येला गेलं पाहिजे. राम मंदिरासाठी या देशातल्या हिंदुंनी जो लढा दिला, त्यात शिवसेनेचाही सहभाग होता. त्याच्या खूणा तिथे दिसतील” असे संजय राऊत म्हणाले.
 
“गेल्या दीड वर्षांपासून उद्धव ठाकरे अयोध्येत गेले. त्यातून नवीन आंदोलन सुरु झालं, त्याचा परिणाम म्हणून राम मंदिर होताना दिसतय” असे संजय राऊत म्हणाले. तिथे गेल्यानंतर राज ठाकरेंना काही मदत लागली तर नक्कीच आम्ही मदत करु असे संजय राऊत यांनी सांगितले.
 

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

वर्ध्यातल्या वाणा नदीत वडील आणि मुलीसह तीन जणांचा बुडून मृत्यू

GT vs RR : गुजरातने राजस्थानला सात गडी राखून हरवून तिसऱ्यांदा आयपीएल अंतिम फेरीत प्रवेश केला

अणुऊर्जा आणि होर्मुझ संकटावरील मोठी घोषणा पुढे ढकलली, अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित

मुंबईत सीएनजी पुन्हा २ रुपयांनी महाग झाला, १७ दिवसांतील ही दुसरी दरवाढ

LIVE:अमरावती विधान परिषद निवडणूक प्रवीण पोते यांचे नामांकन स्थगित

पुढील लेख
Show comments