Festival Posters

राज ठाकरे यांनी मोदी सरकारला फटकारले

शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (21:52 IST)
शेतकरी आंदोलनासंदर्भात भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांनीही ट्विट केलं होतं. या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी मोदी सरकारला फटकारलं आहे.
 
माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, “सरकारनं या गोष्टी करायला नको. ही सगळी खूप मोठी लोकं आहेत. या लोकांना अशा प्रकारचं ट्विट करायला सांगणं. एकाच हॅशटॅगवर सगळ्या लोकांची ट्विट येणं. ही खूपच मोठी माणसं आहेत. त्यांना सरकारने अशा गोष्टींमध्ये पडायला लावू नये. हा सरकारच्या धोरणाचा विषय आहे. हा काही देशाचा विषय नाही. काही चीनमधून संकट आलंय. पाकिस्तानमधून आलंय. शेतकऱ्यांचं संकट आहेच मोठं, पण या सर्व गोष्टींसाठी सर्व लोकांना… त्या अक्षय कुमारवरती आटपायचा ना विषय. लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर ही भारतरत्नं आहेत. खूप मोठी माणसं आहेत. त्यांना अशा गोष्टी करायला सांगणं… ती साधी माणसं आहेत. सरकारनं त्यांना सांगितलं, त्यांनी ट्विट केलं, पण आज जे ट्रोल होतंय आज त्यांच्यावरच येतंय,” असं म्हणत राज ठाकरे यांनी सरकारला फटकारलं.

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

स्वच्छता मोहिमेत लखानी महाराष्ट्रातील क्रमांक १ चे बस स्थानक ठरले

LIVE: स्वच्छता मोहिमेत लखानी महाराष्ट्रातील क्रमांक १ चे बस स्थानक ठरले

ट्विशा शर्माच्या मृत्यू प्रकरणात नवे वळण, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

आजपासून सिलेंडर बुकिंग आणि डिलिव्हरीची संपूर्ण प्रणाली बदलली, नवीन नियमांविषयी जाणून घ्या

CBSE Re-evaluation: पोर्टल न उघडल्याने विद्यार्थी नाराज, मंडळाने विद्यार्थ्यांना संयम राखण्याचे आवाहन केले

पुढील लेख
Show comments