Marathi Biodata Maker

राजू शेट्टी पुन्हा आक्रमक, मुख्यमंत्र्यांच्या घरावर चाल करणार असा दिला इशारा

मंगळवार, 11 जून 2019 (16:22 IST)
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी अमरावती जिल्ह्यातील लोणी (ता. वरूड) येथे झालेल्या दुष्काळ पाणी परिषदेत त्यांनी सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.  
 
विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे आठ दिवसांत तातडीने पंचनामे करावेत व वाळलेल्या संत्रा बागेला १ लाख तसेच टँकरने पाणी घालून जगविलेल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यास एकरी ५० हजार रूपये तातडीची मदत करावी, अशी मागणी राजू शेट्टी यांनी या परिषेदत केली. गरज पडल्यास शेतकरी प्रश्नी मुख्यमंत्र्यांच्या घरावर चाल करणार, असा इशाराही त्यांनी दिलाय. या परिषेदत अनेक मागण्या सर्वानुमते करण्यात आल्या.
 
जलयुक्त शिवार योजनेमध्ये वरूड तालुक्यात ५०० कोटी रूपये खर्चूनही कूपनलिकेला १२०० फुटांपर्यंत पाणी लागेना. मग इतका पैसा खर्च करूनही हे पाणी मुरले कुठे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. यामुळे यामध्ये झालेल्या भ्रष्ट्राचाराची निवृत्त अभियंता व सुशिक्षीत बेरोजगार अभियंत्यामार्फत चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सर्व पहा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

१ जूनपासून ट्रायम्फ बाईक खरेदी करणे महाग होणार

इस्रायली हल्ल्यांमध्ये १० ठार, नेतान्याहू यांनी गाझावर ७०% नियंत्रण असल्याची घोषणा केली

आयसीसीने महिला टी-२० विश्वचषकासाठी सामना अधिकाऱ्यांची घोषणा केली

LIVE: मराठा आरक्षणासाठी मनोज जारंगे पाटील पुन्हा उपोषणाला बसणार

अमेरिकन आणि इराणी वाटाघाटीकारांनी शस्त्रसंधी ६० दिवसांसाठी वाढवण्यास सहमती दर्शवली

पुढील लेख
Show comments