Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रामदास आठवलेंचे मोठे विधान! म्हणाले, "राज ठाकरेंना 'एनडीए'मध्ये घेण्याची गरज नाही

Updated: शुक्रवार, 22 मार्च 2024 (13:51 IST)
 
नेमकं काय म्हणाले रामदास आठवले ?
रामदास आठवले यांनी म्हटलं की, “राज ठाकरे हे अमित शाह यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेले होते. पण राज ठाकरे युतीसाठी भेटलेले असावेत वाटत नाही. राज ठाकरे आल्याने फार फायदा होईल, असं मला वाटत नाही. त्यांना सोबत घेण्याची गरज नाही, अशी आमची भूमिका आहे. परंतु राज ठाकरेंबाबत भाजप काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल,” असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
 
राहूल गांधींना देखील एनडीएमध्ये यावं लागेलं
सध्या सगळेच एनडीएमध्ये येऊ लागले आहे. काँग्रेसचे लोक देखील एनडीएमध्ये येत आहेत. सध्या काँग्रेसमधून एवढे लोक बाहेर पडत आहेत की शेवटी सोनिया गांधी आणि राहुल गांधीच तेथे राहतील अशी स्थिती आहे. एक दिवस राहूल गांधींना देखील इकडे यावं लागेल”, असं रामदास आठवले यांनी म्हटलं.
 
राज्यातील राजकीय पक्षांच्या परिस्थितीबाबत भाष्य करताना त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पक्ष फुटीला त्या पक्षांचे प्रमुख नेतेच जबाबदार असल्याचा आरोप केला. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी आधीच सर्व आमदारांशी चर्चा करून त्यांना गटबाजी करण्यापासून रोखायला हवे होते, असे मत त्यांनी व्यक्त केले. यशिवाय आगामी लोकसभा निवडणुकीत आरपीआय पक्षाला किमान दोन जागा मिळण्याबाबतची मागणी आठवले यांनी केली आहे. त्यांनी या निवडणुकीत आपले 2 तरी खासदार निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

Edited By -Ratnadeep Ranshoor  

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

नागपुरात दारूच्या नशेत पतीकडून पत्नीचा गळा दाबून खून; गुन्हा लपवण्यासाठी रचले खोटे नाटक

नाशिकच्या मसुदा मतदार यादीतून १०.२७ लाखांहून अधिक नावे वगळली

सणासुदीच्या काळात बनावट खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर एफडीए कारवाई करणार

मराठा आरक्षणाच्या लढाईत मराठा आणि ओबीसी पुन्हा एकदा आमने सामने आले

शाळकरी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! दप्तराचे वजन १०% पेक्षा जास्त नको; शिक्षण विभागाचा आदेश

पुढील लेख
Show comments