Dharma Sangrah

विधिमंडळातर्फे स्व. वसंतराव डावखरे यांचा स्मृतिग्रंथ बनवावा - रामराजे नाईक निंबाळकर

शनिवार, 13 जानेवारी 2018 (16:22 IST)

स्व. वसंतराव डावखरे हे अद्वितीय व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील योगदान मोलाचे आहे. म्हणूनच त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विधिमंडळाने स्मृतिग्रंथ तयार करावा, अशी मागणी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली आहे.

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते स्व. वसंतराव डावखरे यांच्या शोकसभेचे आयोजन मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात आले. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी तसेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी निंबाळकर यांच्या मागणीला दुजोरा दिला. यावेळी खा. शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शिक्षणमंत्री 
विनोद तावडे  कपील पाटील, भाजपचे भाई गिरकर, खा. रामदास आठवले, आ. निलम गोऱ्हे, पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यविकासच्या कॅबिनेट मंत्री महादेव जानकर, जेष्ठ नेते पद्यमसिंह पाटील, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर नाईक, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, आ. निरंजन डावखरे, आ. भाई जगताप, विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव अनंत कळसे, खा. माजिद मेमन उपस्थिती होती.

 

ठाण्यातील सार्वजनिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनात वसंत डावखरे यांचा उल्लेख कायम राहील. त्यांनी शेवटपर्यंत सभागृहाची प्रतिष्ठा जपण्याचे काम केले. असा उत्कृष्ट संसदपटू, लोकांशी समरस होणारा नेता आज आपण गमावला आहे अशा शब्दात शरद पवार यांनी स्व. वसंत डावखरे यांना श्रद्धांजली वाहिली. तर जनतेप्रती वसंत डावखरे यांचे असलेलं प्रेम ठाणेकरांनी अनुभवलं आहे. ठाणे शहराचे महापौरपद भूषवत असताना त्यांनी नेहमी शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील 'वसंत'पर्व हरपले असे म्हणत त्यांनी आदरांजली वाहिली.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

ईव्हीएम' विरुद्ध 'बॅलेट पेपर'च्या राजठाकरेंच्या बहिष्काराच्या मागणीला महाविकास आघाडीचा पाठिंबा

भारतात चांदी ५००० रुपयांनी आणि सोने ४०० रुपयांनी स्वस्त झाले, आजचे दर जाणून घ्या

LIVE: वर्ध्यातील ४१,३४० विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार

पद्मश्री मालती जोशी यांच्या स्मरणार्थ आयोजित 'स्मृती कल्प' कार्यक्रमांतर्गत साहित्य आणि चित्रपटसृष्टीतील मान्यवर इंदूरमध्ये एकत्र येणार

मान्सूनचे राज्यात आगमन, भंडारा येथे १० जून पर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

पुढील लेख
Show comments