Festival Posters

२४ डिसेंबरचा संविधान महामोर्चा स्थगित

Updated: बुधवार, 21 डिसेंबर 2016 (09:53 IST)
 
अट्रोसिटी कायद्याच्या कडक अंमलबजावणीसह एससी एसटी भटके विमुक्त ओबीसी व अल्पसंख्याक समाजाच्या  विविध मागण्यांसाठी मुंबईतील तरुणांनी एकत्र येऊन एक सर्वसमावेशक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता सदर निर्णयास अनुसरून विविध समाजघटक , सर्वपक्षीय बौद्ध,एस.सी, एस.टी भटके विमुक्त ओबीसी व अल्पसंख्यांक लोकप्रतिनिधी विविध संस्था संघटना आदींच्या गाठीभेटी घेतल्या , मुंबईत ठिकठिकाणी बैठका  घेऊन  वातावरण निर्मिती केली होती , शिवाय २६ नोव्हेंबर रोजी चेंबूर ते चैत्यभूमी अशी २५ हजार लोकांचा समावेश असलेली संविधान गौरव बाईक मोटार  रॅली काढली होती. एकंदरीत तयारी, पोलीस परवानगी , स्टिकर्स , हॅंडबिल्स , व कटआऊट बॅनर च्या माध्यमातून ५ व ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमीसह मुंबईत ठिकठिकाणी उत्साहपूर्ण वातावरणात या महामोर्चाची तयारी कृती समिती व समाजाने केली होती , 
 
दरम्यानच्या काळात समाजातील विविध मान्यवर नेत्यांनी २४ डिसेंबर , २१ जानेवारी आणि जानेवारीचा तिसरा आठवडा असे वेगवेगळ्या तारखेचे तीन मोर्चे मुंबईत घोषित केले . राज्यातील मागासवर्गीय , अल्पसंख्यांक ओबोसी भटके विमुक्त आदी समाजाच्या प्रश्नांवर जिल्हानिहाय सर्वसमावेशक एकच लाखोंचे मोर्चे निघत असताना आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत एकाच प्रश्नावर वेगवेगळे मोर्चे कशासाठी व कोणासाठी त्यातून काय साध्य होणार आहे असा सवाल संविधान  गौरव बहुजन महामोर्चा कृती समितीने केला आहे . यासंदर्भात या तीन मोर्च्याच्या सर्व आयोजकांसोबत एकच मोर्चा काढण्यासंदर्भात   चर्चा करण्याचा निर्णय कृती समितीने  घेतला आहे ,  या प्रक्रियेला लागणारा कालावधी  व समाजाचे हित लक्षात घेता दोन पाऊले मागे घेऊन शनिवार दिनांक २४ डिसेंबर २०१६ रोजी मुंबईच्या आझाद मैदान येथे होत असलेला समाजाचा संविधान गौरव बहुजन महामोर्चा स्थगित  करून पुढे ढकलण्यात  येत असल्याची माहिती या कृती समितीच्या वतीने आज देण्यात आली .  वेगवेगळे मोर्चे काढून समाजात दुहीचे वातावरण कुणीही निर्माण करू नये समाज अशा कृत्याचे समर्थन करणार नाही असे आवाहन कृती समितीने यावेळी केले . 

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

महाराष्ट्र टीईटी पेपर लीक प्रकरणातील मुख्य आरोपी बीरेंद्रकुमार गुप्ता याला बिहारमधून अटक

भारत आणि पाकिस्तान उपांत्यपूर्व फेरीपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करतील, आशियाई खेळांमधील क्रिकेटचे वेळापत्रक जाणून घ्या

पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात १२ सैनिकांसह १५ जण ठार

LIVE: पुणे आणि मुंबईसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी

आषाढी एकादशीच्या दिवशी प्रवाशांना दिलासा, मध्य रेल्वे मिरज-दादर एकमार्गी विशेष ट्रेन चालवणार

पुढील लेख
Show comments