suvichar

शरद पवार निवृत्तीच्या निर्णयावर फेरविचार कऱणार-अजित पवार

मंगळवार, 2 मे 2023 (20:34 IST)
आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना घरी जाण्य़ाचे आवाहन विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केलं. निर्णयावर फेरविचार करण्यासाठी 2 ते 3 दिवसांचा वेळ लागेल. राजीनाम्याचे सत्र थांबवा असे शरद पवार यांनी सांगितले आहे.मात्र जर कार्यकर्ते आंदोलनाच्या भूमिकेत असतील तर निर्णय बदलाचा विचार होणार नाही. त्यामुळे तुम्ही घरी जावा असे शरद पवार यांनी सांगितले. तुम्ही जर आंदोलन करणार असाल तर साहेबांचा निर्णय बदलणार नाही. त्यामुळे शांत रहा आणि घरी जावा अशी विनंती विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केली.शरद पवार यांच्यासोबत बैठक पार पाडल्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला.वाय.बी.चव्हाण सेंटरबाहेरून ते बोलत होते.यावेळी सुप्रिया सुळे, छगन भूजबळ, जयंत पाटील. रोहित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.
 
आंदोलकांना शांत राहण्याची विनंती करताना अजित पवार म्हणाले की, कुणीही आंदोलन, रास्ता रोको, उपोषण करू नका. किंवा राजीनामा देऊ नका . कोणाचाही राजीनामा मंजूर होणार नाही. तुम्ही जर शरद पवार यांना मानत असाल तर एकही कार्यकर्ता रस्त्यावर दिसणार नाही. तुम्हाला त्यांच ऐकायला लागेलचं.तुमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहचल्या आहेत. महाराष्ट्राच्या संस्कृतीला बाधा येणार नाही. साहेबांना त्रास होईल असं वागू नका. आंदोलन करणारे लोक उपाशी आहेत याचा मानसिक त्रास शरद पवार यांना होत आहे असा निरोप अजित पवार यांनी दिला असल्याचे अजित पवार म्हणाले.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

LIVE: मुंबईच्या मानखुर्द परिसरात तीन मजली चाळ कोसळली

आयएमडीने सोमवारी मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला

ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने सातव्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला

विद्यार्थ्यांना मोठा धक्का, महाराष्ट्रासह देशभरातील ५८ अभियांत्रिकी महाविद्यालये बंद झाली

मुंबईत मुसळधार पावसात झाड कोसळून वृद्ध व्यक्तीचा मृत्यू

पुढील लेख
Show comments