Marathi Biodata Maker

ठाकरे बंधूंचा 'ईव्हीएम'वरून खळबळजनक दावा! 'PADU' उपकरणाद्वारे मतचोरीचा राज्य निवडणूक आयोगाचा डाव

Updated: बुधवार, 14 जानेवारी 2026 (15:18 IST)
पाडू नावाच्या उपकरणाने मतदानात फेरफार करण्याची शक्यता असल्याचे मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले. 
ALSO READ: मुंबई उच्च न्यायालयाने 67 बिनविरोध उमेदवारांविरुद्ध मनसेची याचिका फेटाळली
शिवतीर्थावर घेतलेल्या ठाकरे बंधूंच्या संयुक्त पत्रकार परिषदेत राज ठाकरे म्हणाले की, आगामी निवडणुकीत ईव्हीएमला पाडू नावाचे एक उपकरण जोडले जाणार आहे. हे उपकरण नेमके काय काम करते, कसे काम करते, या उपकरणाचे उद्धिष्ट काय आहे या बाबत निवडणूक आयोगाने काहीच माहिती दिलेली नाही. हे नवीन उपकरण मतचोरी करण्यासाठी तर नाही न असा प्रश्न राज ठाकरेंनी केला आहे. 
ALSO READ: मुंबई पोलिस हाय अलर्टवर, 15 जानेवारीला मतदान, 16 रोजी मतमोजणी
उद्धव ठाकरे यांनीही राज ठाकरेंच्या सुरात सूर मिसळत केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर टीका केली. “जर लोकशाहीत मतदारांचा विश्वासच उडाला, तर निवडणुका घेण्याला काय अर्थ आहे?” असा सवाल त्यांनी केला. मुंबई महानगरपालिका काबीज करण्यासाठी यंत्रणेचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप दोन्ही नेत्यांनी यावेळी केला. बऱ्याच वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकाच मंचावर आल्याने आणि त्यांनी थेट ईव्हीएमच्या तांत्रिक बाबींवर बोट ठेवल्याने राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. 
ALSO READ: गिरीश महाजन यांची मोठी घोषणा: तपोवन मध्ये भव्य राम मंदिर बांधले जाईल
 PADU हे युनिट निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी किंवा तांत्रिक मदतीसाठी वापरले जाऊ शकते. मात्र, राज ठाकरे यांनी यावर संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, या उपकरणाच्या माध्यमातून मतदानाची आकडेवारी बदलली जाऊ शकते किंवा विशिष्ट उमेदवाराला फायदा होईल अशा पद्धतीने ‘प्रोग्रामिंग’ केले जाऊ शकते. निवडणूक आयोगाने यावर तातडीने खुलासा करावा, अशी मागणी आता ठाकरे गटाकडून आणि मनसेकडून केली जात आहे.
 
Edited By - Priya Dixit
 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

"ही माझी शेवटची भेट असू शकते": मुंबई मोर्चापूर्वी मनोज जरांगे भावूक; ते आपल्या आवाहनात म्हणाले...

चहापासून ते किराणा मालापर्यंत... आता 2,000 पर्यंतचे UPI पेमेंट विनाशुल्क होणार, केंद्र सरकारची मोठी घोषणा

सरकार महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी संहिता (UCC) आणण्याच्या तयारीत!

LIVE: हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडसाठी पावसाचा इशारा जारी केला

LIVE: दिशा सालियन प्रकरणात मोठा वळण: CBI कडून FIR दाखल

पुढील लेख
Show comments