Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा या आठवड्यात संपुष्टात येऊ शकते

Updated: सोमवार, 8 ऑगस्ट 2022 (15:24 IST)
 
रविवारीच दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, मंत्रिमंडळाचा विस्तार इतक्या लवकर होऊ शकतो, ज्याची तुम्ही लोकांनी कल्पनाही केली नसेल. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात १५ ऑगस्टपर्यंत मंत्रिपरिषद स्थापन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपच्या कोट्यातून चंद्रकांत पाटील, आशिष शेलार या ज्येष्ठ नेत्यांना स्थान मिळण्याची चर्चा आहे.
 
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस गेल्या दोन दिवासांपासून दिल्लीत होते. या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निती आयोगाच्या बैठकीत एकनाथ शिंदेही सहभागी झाले होते. या बैठकीला देशभरातून एकूण २३ मुख्यमंत्री आले होते. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिंदे आणि फडणवीस यांनी भाजप पक्षश्रेष्ठींची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने विरोधकांकडून सातत्याने टीका होत आहे. तसेच, जिल्ह्यांना पालकमंत्री नसल्याने अनेक कामे खोळंबल्याचे सांगितले जात आहे. यापार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्तार येत्या एक-दोन दिवसातच करण्याचे निश्चित झाले आहे. गृहमंत्रीपदाची मागणी शिंदे गटाकडूनही होत होती. मात्र, मुख्यमंत्रीपद शिंदे यांना दिल्याने भाजपने गृहमंत्रीपद स्वतःकडे घेण्याची भूमिका ठेवली होती. आता हा तिढा सुचल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. राज्यपाल सुद्धा महाराष्ट्रात परतले आहेत. येत्या १२ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेतील वादाची सुनावणी होत आहे. त्यापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चिन्हे आहेत.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

इराणसमोर अणुकरारावर शेवटची संधी; ट्रम्प यांनी मोठा इशारा दिला

अटल पेन्शन योजनेअंतर्गत दरमहा किती पैसे जमा करावे लागतात? येथे जाणून घ्या...

लाँग्सनिंग एफसीने ड्युरँड कप फुटबॉलमध्ये मुंबई एफसीचा पराभव केला

सरकारी कार्यालयात जाण्याची सक्ती संपली! महाराष्ट्र सरकारने 'प्रक्रिया पुनर्रचना' अंतर्गत पाच प्रमुख प्रशासकीय सुधारणा लागू केल्या

LIVE: अमरावतीमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार, ५७,००० हेक्टर पिकांचे नुकसान

पुढील लेख
Show comments