Marathi Biodata Maker

बाळासाहेब नसते तर मोदी कुठे असते-उद्धव ठाकरे

Updated: शुक्रवार, 15 मार्च 2024 (09:39 IST)
 
धाराशिवमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे ओम राजेनिंबाळकर खासदार आहेत. खासदार ओम राजेनिंबाळकर म्हणाले की, जे आज म्हणत आहे की शिवसेनेचे खासदार नरेंद्र मोदींमुळे निवडून आले. त्यांना आठवण करुन देतो की मोदींचा राजकीय जन्मही झाला नव्हता तेव्हापासून धाराशिवमध्ये शिवसेनेचा खासदार निवडून येत आहे. या मतदारसंघाने मोदींच्या आधी तीनवेळा शिवसेनेचा खासदार निवडून दिला आहे. या जनसंवाद यात्रेत खासदार संजय राऊत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उपनेत्या सुषमा अंधारे उपस्थित होत्या.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :
 
– भाजपा नेत्यांना वाटले होते की आमदार, खासदार फोडले म्हणजे शिवसेना फुटेल. पण शिवसेना अशी फुटणार नाही. शिवसैनिक तुम्हाला गाडून, मुठमाती देऊनच थांबणार.
–  मणिपूरमध्ये शेपूट घालणारा गृहमंत्री आमच्यावर बोलून गेला.
– ज्यावेळी मोदी नाव कोणाला माहित नव्हते, तेव्हाही आम्ही धाराशिव जिंकत होतो.
– बाळासाहेब ठाकरे नसते तर मोदी कुठे असते. अटलबिहारी वाजपेयींनी मोदींना केचऱ्याच्या टोपलीत टाकण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी मोदींना वाचवले. तेव्हा वाचवले नसते तर मोदी कुठे असते?
– महायुती सरकारच्या ट्रिपल इंजिनला भ्रष्टाचाराची चाकं.
– याचं हिंदूत्व आणि आमचं हिंदूत्व वेगळं आहे.
– आता त्यांनी सुरु केलं आहे की १४० कोटी लोक माझा परिवार आहे.
– मी मुख्यमंत्री असताना म्हटलं होतं, माझे कुटुंब, माझी जबाबदारी. मोदींनी अर्धच घेतलं. माझा परिवार, पण या परिवाराची जबादारी कोण घेणार?
Edited By - Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

एफडीएने महाराष्ट्रात १५ हून अधिक सौंदर्यप्रसाधनांवर कारवाई करत त्यांच्या विक्रीवर बंदी घातली

बीएमसीचा मोठा निर्णय, प्रलंबित जन्म दाखल्याच्या अर्जांवर त्वरित कार्यवाही केली जाईल

LIVE: महाराष्ट्र एफडीएने १५ हून अधिक सौंदर्य प्रसाधनांच्या विक्रीवर बंदी घातली

मस्जिद बंदर स्टेशनवर एका प्रवाशाला धावत्या लोकल ट्रेनमधून ढकलून दिल्याचा आरोप मध्य रेल्वेने फेटाळला

नागपुरात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पेंच प्रकल्पातून सिंचनाचे पाणी तात्काळ सोडण्याचे आदेश दिले

पुढील लेख
Show comments