मंदिर समितीने घेतलेल्या या धोरणात्मक निर्णयामुळे भाविकांना विठुरायाचे दर्शन घेणे सुलभ जाणार आहे. या टोकन दर्शन व्यवस्थेचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार करणार असल्याने यासाठी समिती अथवा भाविकांना आर्थिक झळ बसणार नाही. याशिवाय भाविकाला पंढरपुरात आल्यावर आपल्या दर्शनाची नक्की वेळ समजणार आहे.