Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जन्म आणि मृत्यूच्या नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य नाही

Updated: सोमवार, 28 डिसेंबर 2020 (10:26 IST)
 
या प्रमाणेच, जन्माचे प्रमाणपत्र तर मुलांच्या भविष्याशी निगडित सर्वकामां मध्ये उपयुक्त आहे. शाळेत दाखला घेताना जन्म प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. 

अशा प्रकारे ड्रायव्हिंग लायसन्स बनविताना,पासपोर्ट बनविताना किंवा एखादी विमा पॉलिसी घ्यावयाची असल्यास किंवा इतर शिधापत्रिका किंवा रेशनकार्ड किंवा सोशल सिक्युरिटी कार्यक्रम मध्ये भाग घेण्यासाठी ह्याचा वापर केला जातो.म्हणून आपण जन्म-प्रमाणपत्र आवर्जून बनवावे.
 
अशा प्रकारे मृत्यूच्या नोंदणीचे देखील फायदे आहे या मध्ये सर्वात मोठा फायदा वारसा हक्का विषयी आहे. या मध्ये संपत्तीचे वितरण किंवा हस्तांतरण तेव्हाच शक्य आहे, जेव्हा मृत्यूचे प्रमाणपत्र आपल्याकडे आहे. या शिवाय पेंशन, विमा, जमिनीच्या हस्तांतरणाची प्रक्रिया मृत्यू प्रमाण पत्र मिळण्याच्या नंतरच होते. 

सांगू इच्छितो की ही संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे आणि जन्म किंवा मृत्यूच्या 21 दिवसाच्या आत कुटुंबातील कोणताही सदस्य याची नोंदणी करू शकतो. 21 ते 30 दिवसाच्या आत 2 रुपयांचे विलंब शुल्क द्यावे लागते तर 30 दिवस ते 1 वर्षाच्या आत नोंदणी केल्याने नोटरीकडून पत्र सत्यापित करवून जिल्हा सांख्यिकी अधिकारी किंवा अतिरिक्त जिल्हा पंजीयक किंवा विकास अधिकारी कडून प्रतिज्ञापत्र सही करवावे लागते.
 
 या नंतर जन्म-मृत्यूचे प्रमाणपत्र मिळतात. म्हणून 21 दिवसाच्या आतच या प्रक्रियेला पूर्ण करावे. जरी घटना किती ही जुनी असो जन्म-मृत्यूच्या नोंदणी अधिनियम 1969 च्या 9 (3 )च्या नुसार नोंद केली जाऊ शकते. 
 
वेग वेगळ्या राज्यात वेगवेगळ्या वेबसाइट्स वर ही प्रक्रिया ऑनलाईन केली जात आहे, परंतु मुळात नियम सर्वत्र एकसारखेच आहे आणि आता या साठी आधार कार्ड बनविण्याची देखील आवश्यकता नाही. सांगत आहोत  की रजिस्ट्रार ऑफ जनरल इंडिया(आरजीआय)ने ही माहिती दिली आहे की आता जन्म आणि मृत्यू नोंदणी साठी आधार क्रमांक अनिवार्य नाही. एवढेच नव्हे तर आरजीआय ने ही माहितीएका आरटीआय च्या प्रत्युत्तरात दिली आणि परिपत्रक जारी करताना म्हणाले की जर कोणी व्यक्ती स्वेच्छाने आधार क्रमांक देतो तर कोणत्याही परिस्थितीत हे खात्री करावे लागेल की आधार कार्डाची प्रिंटआऊट तर घेतलेली नाही आणि जन्म-मृत्यूच्या डेटाबेस मध्ये आधार कार्डाचे क्रमांक नसावे. 
 
परिपत्रिकेत स्पष्टपणे नमूद केले आहे की 'कोणत्याही परिस्थितीत आधार क्रमांक डेटाबेस मध्ये संग्रहित केले जाणार नाही, तसेच कोणत्याही दस्तएवजेवर प्रिंट केला जाणार नाही. आवश्यक असल्यास आधार क्रमांकाचे पहिले चार अंकच प्रिंट केले जाऊ शकतात.
 
आपल्याला काहीच माहिती नसल्यास आपण आपल्या जवळच्या सीएससी(कॉमन सर्विह्स सेंटर -जनसुविधा केंद्र)वर जाऊन ह्याची संपूर्ण माहिती घेऊ शकता. तिथल्या राज्यानुसार अचूक माहिती मिळण्याची शक्यता आहे.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

गणेशोत्सवात मंडपात 'महाप्रसाद' वाटण्यापूर्वी सावधगिरी बाळगा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागू शकते

ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान दोन गटांत झालेल्या संघर्षानंतर मुंबईच्या परळ भागात तणाव

महाराष्ट्रात H1N1 इन्फ्लूएंझाचा प्रादुर्भाव वाढला; १,१०९ रुग्णांची नोंद, त्यापैकी ६५% रुग्ण पुणे आणि मुंबईतील

Central Railway Updates: टिटवाळा स्थानकावर २८ ऑगस्टपासून १५ दिवसांचा 'मेगा ब्लॉक'; अनेक लोकल गाड्या रद्द होणार

नेपाळमधील पुरामुळे हत्ती वाहून भारतात आले; त्यांची अवस्था पाहून लोकांचे मन हेलावले

पुढील लेख
Show comments