Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोबाइल चोरीला गेला तर वेळ न घालवता करा 'या' 5 गोष्टी

Updated: बुधवार, 20 एप्रिल 2022 (09:32 IST)
 
इंटरनॅशनल मोबाइल इक्विपमेन्ट आयडेन्टिटी (आयएमईआय) या संस्थेच्या सहाय्यानेसुद्धा हे करता येतं. ही एक आंतरराष्ट्रीय नोंदणीसंस्था असून ती आपला मोबाइत तातडीने बंद करू शकते.
 
त्यासाठी मोबाइलमधील कोड कुठेतरी लिहून ठेवावा. डिव्हाइस बॉक्समध्ये किंवा मोबाइल फोनमध्ये हा कोडनंबर मिळतो.
 
2. अॅपचे पासवर्ड बदलावेत
चोरीला गेलेल्या मोबाइलवरील सर्व अॅपचे पासवर्ड लगेचच बदलून टाकायला हवेत, असं सिमोनी सांगतात. असं केलं नाही तर मोबाइलचोराला आपली खाजगी आणि इतर महत्त्वाची माहिती मिळू शकते.
 
विशेषतः बँकिंग अॅप स्वतःहून ओळखतपासणीची प्रक्रिया पार पाडत नाहीत.
 
परंतु, ई-मेल, सोशल मीडिया, एसएमएस, या द्वारे संबंधित चोराला पासवर्ड मिळवता येऊ शकतो. एसएमएस ऑथेन्टिकेशनची प्रक्रिया पार पाडून तो बँकेच्या खात्यापर्यंत पोचू शकतो.
 
काही संकेतस्थळांच्या माध्यमातून असे पासवर्ड तातडीने बदलता येतात.
 
फेसबुक आणि इन्स्टाग्राम यांसारख्या समाजमाध्यमांशी संबंधित पासवर्ड बदलायची सोय 'लॉग-इन'च्या किंवा 'सिक्युरिटी'च्या सेटिंगमध्ये असते. जी-मेलचा पासवर्ड 'पर्सनल इन्फर्मेशन' या विभागात जाऊन बदलता येतो.
 
3. बँकांना आणि इतर संबंधित वित्तसंस्थांना कळवा
फोन चोरीला गेला तर तत्काळ आपल्या बँकेला व संबंधित वित्तसंस्थांना कळवून ठेवावं. अशी माहिती मिळाल्यावर बँक तुमच्या मोबाइल फोनवरील अॅप ब्लॉक करू शकते.
 
संबंधित चोर तुमच्या खात्यावरील पैसा एखाद्या तिसऱ्याच खात्यावर पाठवण्याच्या तयारीत असेल, तर त्याला यापासून रोखणं शक्य आहे.
 
प्रत्येक बँक अशा प्रकारची सेवा देते. बँकांच्या संकेतस्थळांवर याची माहिती नोंदवलेली असते. बँकेचे दूरध्वनी क्रमांकही गुगलवर सहज उपलब्ध होतात.
 
4. तुमच्या मित्रमैत्रिणींना व नातेवाईकांनाही कळवा
मोबाइल चोरीला गेल्याचं तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना कळवणं आवश्यक आहे.
 
गुन्हेगार लोक मेसेजिंग अॅपचा वापर करून किंवा तुमचं सोशल मीडियावरील खातं वापरून तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना शोधू शकतात आणि त्यांच्या पैशांचाही अपहार होऊ शकतो, त्यांच्या बँकखात्याचा तपशील मिळवून गैरव्यवहार केले जाऊ शकतात.
 
5. पोलिसांकडे तक्रार नोंदवा
मोबाइल चोरीला गेल्यावर पोलिसांकडे तक्रार करणं आवश्यक आहे.
 
अशा तक्रारीची प्रत म्हणजे फोन चोरीला गेल्याचा तुमच्याकडील पुरावा असतो.
बँका, विमा कंपन्या आणि इतरही काही ठिकाणी हा पुरावा गरजेचा ठरतो.
 
अनेकदा मोबाइल चोरीला गेल्यानंतर त्यातील तुमच्या ओळखीशी संबंधित कागदपत्रं चोरीला जातात. ओळख पटवणाऱ्या कागदपत्रांविना आपली अडचण होते. अशा वेळी पोलीसही आपली चौकशी करू शकतात.
 
त्यामुळे मोबाइल चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांकडे करणं गरजेचं आहे. तक्रार दाखल केल्यावर गुन्ह्याचा तपास करण्याची जबाबदारी पोलिसांवर असते.
 
मोबाइल फोन जास्त संख्येने कुठल्या भागांमध्ये चोरीला जातात, याची माहिती गोळा करायलासुद्धा पोलिसांना या तक्रारींचा उपयोग होतो. अशा ठिकाणी लोकांनी अधिक सजग राहावं, अशी सूचना पोलीस करू शकतात.
 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नागपूरमध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ, महानगरपालिकेने सतर्कतेचा इशारा दिला!

एअर इंडियाची मोठी घोषणा, मुंबई-टोरोंटो थेट विमानसेवा २५ ऑक्टोबरपासून सुरू होणार

LIVE: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसने सोडले टीकास्त्र

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसने सोडले टीकास्त्र , राष्ट्रवादी काँग्रेसने दिले प्रत्युत्तर

सीएसएमटी आणि सावंतवाडी दरम्यान नवीन नियमित रेल्वेगाडी धावणार

पुढील लेख
Show comments